Vaibhav Sooryavanshi: वैभवनं फक्त 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं, तरीही भलताच खेळाडू ठरला सामनावीर, असं का?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला. कालच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 18 चेंडूत अर्धशतक ठोकले पण त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळाला नाही असं का ते जाणून घ्या...

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु असून पहिला सामना काल रंगला जो भारतीय संघाने जिंकला. मागील काही महिन्यातील भारतीय संघाची टी-ं20 मथील कामगिरी पाहता झिम्बाब्वेविरुद्धही मालिका चांगली जाईल की नाही असा प्रश्न होता पण भारतीय संघाने अखेर कमबॅक केला. श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणूनही पहिला सामना जिंकता आला. वैभव सूर्यवंशीकडे विशेष लक्ष होते. आता वैभवने पण कमाल केली आहे. हरारे क्रिकेटचे मैदान वैभव सूर्यवंशीसाठी पुन्हा एकदा शुभ ठरले. भारतीय क्रिकेटमधील या सर्वात तरुण खेळाडूने याच मैदानावर इतिहास रचला. यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात, वैभवने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावून भारतीय संघाचा विजय निश्चित केला. असे असूनही, त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले नाही. असं का झालं कारण जाणून घ्या…
सुमारे पाच महिन्यांपूर्वी, हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात, वैभवने अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावांची स्फोटक खेळी केली होती. त्या स्फोटक आणि सामना जिंकवून देणाऱ्या खेळीनंतर, वैभवने याच मैदानावर पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. झिम्बाब्वेच्या 126 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना, वैभवने अवघ्या 18 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले, जे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठरले. यासोबतच, तो टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाजही ठरला.
टीम इंडियाचा सलामीवीर वैभव यादवने 19 चेंडूंमध्ये चार चौकार आणि चार षटकारांसह 50 धावा केल्या. असे असूनही, टीम इंडियाच्या विजयानंतर त्याला सामनावीर म्हणून घोषित न करता, वेगवान गोलंदाज मयंक यादवला हा पुरस्कार देण्यात आला. याचे कारण म्हणजे मयंकची भेदक गोलंदाजी, ज्यामुळे झिम्बाब्वेला सावरण्याची संधीच मिळाली नाही. स्फोटक गोलंदाज मयंक यादव जवळपास 650 दिवसांनंतर भारतीय संघात परतला. त्याचा शेवटचा सामना ऑक्टोबर 2024 मध्ये झाला होता. त्यानंतर दुखापतींमुळे तो अनेक वेळा संघाबाहेर होता. पण हरारेमध्ये टीम इंडियाने गोलंदाजी सुरू करताच आणि मयंकने सामन्याचा पहिला चेंडू टाकताच, त्याने झिम्बाब्वेला चकित केले. त्याने पहिल्याच चेंडूवर झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेटला बाद केले. त्यानंतर, आपल्या तिसऱ्या षटकात त्याने दुसरी विकेट घेत झिम्बाब्वेला अडचणीत आणले.
सतत ताशी सुमारे 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयंकवर मात करणे झिम्बाब्वेच्या फलंदाजांसाठी कठीण ठरले. आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये मयंकने केवळ 18 धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, मयंकने 24 चेंडू टाकले आणि त्यापैकी 17 चेंडूंवर एकही धाव काढता आली नाही. या जबरदस्त गोलंदाजीमुळे झिम्बाब्वेचा डाव केवळ 125 धावांपर्यंतच पोहोचला आणि भारताने सहज विजय मिळवला, ज्यात वैभवनेही योगदान दिले.
