AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : देवाजवळ दिवा का लावतात? दिव्याचे हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी

दिवा लावल्याने आपल्या घरात सुख-शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते. दिवा लावताना त्याची योग्य दिशाही महत्त्वाची असते. साधारणपणे देवासमोर, तुळशीच्या रोपाखाली आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला जातो. ज्योतिष शास्त्रात दिवे लावण्याचे काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत.

Vastu Tips : देवाजवळ दिवा का लावतात? दिव्याचे हे उपाय आहेत अत्यंत प्रभावी
दिवाImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 22, 2023 | 3:48 PM
Share

मुंबई : वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मात दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे. भारतीय संस्कृतीत पूजेच्या वेळी दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. शास्त्रानुसार दिवा लावल्याने देवाचा आशीर्वाद मिळतो आणि धार्मिक भावना व्यक्त होतात. दिवा लावल्याने (Diya Vastu Tips) देवाचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घराची आर्थिक स्थितीही सुधारते. यामुळे आपल्या घरात सुख-शांती राहते आणि नकारात्मक ऊर्जाही दूर होते. दिवा लावताना त्याची योग्य दिशाही महत्त्वाची असते. साधारणपणे देवासमोर, तुळशीच्या रोपाखाली आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावला जातो. ज्योतिष शास्त्रात दिवे लावण्याचे काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत जे घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यास मदत करतात. दिवा लावताना त्याखाली विविध वस्तू ठेवण्याचीही श्रद्धा आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते.

तूप आणि तेलाचा दिवा

दिवा लावताना डाव्या हाताला तुपाचा दिवा आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवावा, असे शास्त्रात सांगितले आहे की यामुळे घरामध्ये मंगलमयता येते.

डाळीवर दिवा लावण्याचे महत्त्व

धार्मिक मान्यतांनुसार हरभरा डाळीवर तेलाचा दिवा लावल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात.

उडीद डाळ

ज्या लोकांना दृष्ट लागण्याची समस्या आहे किंवा वारंवार दृष्ट लागण्याचा त्रास होत असेल त्यांनी उडीद डाळ दिव्याखाली ठेवावी आणि दिवा पश्चिम दिशेला लावावा. ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने वाईट नजरेपासून आराम मिळतो.

तांदूळ

धार्मिक श्रद्धेनुसार तांदूळ हा पूजेचा पदार्थ मानला जातो. शास्त्रानुसार दिवा लावून त्याखाली तांदूळ ठेवल्याने घरात ऐश्वर्य वाढते.

गहू

ज्योतिषशास्त्रानुसार, दिव्याखाली गहू जाळल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी यांचा आशीर्वाद मिळतो. यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते.

वास्तूशास्त्रातले हे उपाय अत्यंत प्रभावी आहे. जुन्या काळापासून हे उपाय अंमलात आणले जात आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.