AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्न करताना मंगळ असलेल्या मुलीला मंगळाचाच मुलगा का लागतो?

मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ (Mangal Dosh) असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला मंगळाचाच जोडीदार योग्य मानला जातो. जोतिषी अभय देशपांडे यांच्या मते पत्रिकेतील मंगळ हा तीन प्रकारचा असतो. कडक, सौम्य आणि निर्दोष. या तीन्ही प्रकारच्या मंगळाचा वेगवेगळा प्रभाव होत असतो.

लग्न करताना मंगळ असलेल्या मुलीला मंगळाचाच मुलगा का लागतो?
लग्न जुळवताना मंगळ दोष का पाहिल्या जातोImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 31, 2023 | 8:07 PM
Share

मुंबई : नकटीच्या लग्नाला सताशे विघ्न अशी म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. असास काहीसा प्रत्यय आपल्याकडे लग्न जमवताना अनेकांना येतो. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुला मुलींची पत्रिका न जुळने. आपल्याकडे अरेंज्ड मॅरेजमध्ये मन जुळो ना जुळो पण पत्रिका जुळणे हे महत्त्वाचे आहे. पत्रिका जुळली तर मुला मुलीचे पुढचे आयुष्य सुखद जाते अशी मान्यता आहे. मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगळ (Mangal Dosh) असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला मंगळाचाच जोडीदार योग्य मानला जातो. जोतिषी अभय देशपांडे यांच्या मते पत्रिकेतील मंगळ हा तीन प्रकारचा असतो. कडक, सौम्य आणि निर्दोष. या तीन्ही प्रकारच्या मंगळाचा वेगवेगळा प्रभाव होत असतो. मंगळ हा वैवाहिक सुखाशी संबंधीत ग्रह आहे. त्यामुळे या ग्रहाला लग्न जुळवताना विशेष महत्त्व देणयात येते. जाणून घेऊया एखाद्याच्या पत्रिकेत मंगळ दोष असल्यास कोणते उपाय करणे लाभदायक ठरेल.

मंगळ दोष आहे हे कसे ओळखावे?

मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. त्यामुळे त्याचा स्वभावगुण थोडा उग्र आहे. सामान्यतः मंगळ हा शक्ती, धैर्य, शौर्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. पत्रिकेत त्याचे शुभ स्थान कोणत्याही व्यक्तीसाठी शुभ सिद्ध होते. पण जर त्यांची उपस्थिती पत्रिकेतील पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि बाराव्या घरात असेल तर या स्थितीला मंगळ दोष आहे असं म्हणतात. या दोषाचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो आणि त्यामुळे व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होतात.

या सोप्या उपायाने कुंडलीतील मंगल दोष दूर होईल

ज्योतिषी अभय देशपांडे यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगल दोष असेल तर त्या व्यक्तीला मांगलिक म्हणतात. ज्या मुलाचा किंवा मुलीच्या पत्रिकेत मंगल दोष असेल त्यांनी फक्त तशाच व्यक्तीशीच लग्न करावे. त्यामुळे दोघांचे अशुभ प्रभाव दूर होऊन वैवाहिक जीवन सुखकर होते, पण जर काही कारणास्तव तुम्ही मंगळ असलेल्या व्यक्तीशी लग्न करत नसाल तर तुम्ही प्रथम कुंभ राशीत लग्न करावे. हा काय प्रकार आहे ते सविस्तर जाणून घेऊया.

कुंभ विवाह कसा होतो आणि यामुळे मंगल दोष कसा दूर होतो?

कुंभ विवाह हा मंगल दोष दूर करण्याचा एक साधा आणि सोपा मार्ग आहे. ज्योतिषी अभय देशपांडे सांगतात की व्यक्तीच्या लग्नापूर्वी कुंभ विवाह केला जातो. यामध्ये घरच्यांना लग्नाची मिरवणूक आल्याची माहिती मिळताच ती सुरू करावी लागते. ही विवाह प्रक्रिया बंद खोलीत पूर्ण होते. फक्त मुलगी, मुलीची आई, विवाह करणार्‍या स्त्रिया, कन्यादान करणारी व्यक्ती आणि विवाह करणार्‍या ब्राह्मणांनाच त्या खोलीत राहावे लागते. परंपरेनुसार, एक कुंडीत पिंपळाचे रोप आणले जाते आणि त्यावर भगवान विष्णूची मूर्ती ठेवली जाते. ब्राह्मण विवाहाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करतीतात आणि त्यानंतर ते जोडीदाराशी लग्न करू शकतात. यामुळे मंगळ दोष दूर होईल आणि वैवाहिक जीवन सुखी होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.