AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse : मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण.... एकनाथ खडसे काय बोलून गेले?

Eknath Khadse : मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण…. एकनाथ खडसे काय बोलून गेले?

| Updated on: Dec 26, 2025 | 11:23 AM
Share

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यामुळे पराभव झाला असेल तर ती आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, गिरीश महाजनांमुळे भुसावळमध्ये भाजपचा पराभव झाल्याचा आरोपही खडसे यांनी केला.

एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा पराभव जर माझ्यामुळे झाला असेल, तर ती त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधत भुसावळमध्ये भाजपचा पराभव महाजनांमुळेच झाल्याचा आरोप केला. खडसे यांनी चोपडा, यावल, भडगाव, पारोळा, पाचोरा आणि भुसावळ यांसारख्या अनेक ठिकाणी भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे निदर्शनास आणून दिले आणि या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.

तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसणार असल्याचा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला, तर ठाकरे बंधूंनी रावसाहेब दानवेंची बिन पाण्याची केल्याचे चंद्रकांत दानवे यांनी म्हटले. या विविध प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

Published on: Dec 26, 2025 11:23 AM