Eknath Khadse : मुक्ताईनगरमध्ये भाजपचा पराभव आनंदाची बाब, कारण…. एकनाथ खडसे काय बोलून गेले?
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्यामुळे पराभव झाला असेल तर ती आनंदाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, गिरीश महाजनांमुळे भुसावळमध्ये भाजपचा पराभव झाल्याचा आरोपही खडसे यांनी केला.
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा पराभव जर माझ्यामुळे झाला असेल, तर ती त्यांच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांनी गिरीश महाजनांवर निशाणा साधत भुसावळमध्ये भाजपचा पराभव महाजनांमुळेच झाल्याचा आरोप केला. खडसे यांनी चोपडा, यावल, भडगाव, पारोळा, पाचोरा आणि भुसावळ यांसारख्या अनेक ठिकाणी भाजपला पराभवाला सामोरे जावे लागल्याचे निदर्शनास आणून दिले आणि या पराभवाला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला.
तर दुसरीकडे चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसणार असल्याचा विश्वास खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केला, तर ठाकरे बंधूंनी रावसाहेब दानवेंची बिन पाण्याची केल्याचे चंद्रकांत दानवे यांनी म्हटले. या विविध प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,

