AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Grahan : दिवसा होणार अंधार.. भारतातही दिसणार का शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण ?

Longest Solar Eclipse 2027 : खगोलशास्त्राच्या जगात, काही घटना शतकानुशतके स्मरणात राहतात. 2 ऑगस्ट 2027 रोजी, अशीच एक जादुई घटना घडणार आहे. या शतकातील सर्वात मोठं, बराच वेळ चालणारं सूर्यग्रहण म्हणून ओळखलं जाणारं एक अद्भुत सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. पण हे ग्रहण भारतातून दिसणार की नाही ?

Surya Grahan : दिवसा होणार अंधार..  भारतातही दिसणार का शतकातलं सर्वात मोठं सूर्यग्रहण ?
सर्वात मोठं सूर्यग्रहण कधी दिसणार आहे ?Image Credit source: PTI
| Updated on: May 07, 2026 | 3:02 PM
Share

Solar Eclipse 2027 : आभाळ अचानक काळवंडलं, दिवसाच रात्रीसारखा माहोल झाला.. असं दृश्य तुम्ही कधी पाहिलंय का ? पण पुढल्या वर्षी. 2 ऑगस्ट 2027 ला हाच नजारा दिसणार आहे. जगभरात अनेकांना हे दृश्य पहाता येणार आहे. हे सूर्यग्रहण केवळ एक सामान्य खगोलशास्त्रीय घटना नव्हे, तर 21 व्या शतकातील सर्वात मोठ्या आणि दुर्मिळ खगोलशास्त्रीय घटनांपैकी एक मानले जातंय. शास्त्रज्ञांच्या मते, हे खग्रास सूर्यग्रहण अंदाजे 6 मिनिटे आणि 23 सेकंद टिकणार आहे. त्यामुळेच ते या शतकातील सर्वात लांब, मोठं (कालावधी) खग्रास सूर्यग्रहण ठरेल. म्हणूनच खगोलशास्त्रज्ञ आणि अंतराळप्रेमी या ग्रहणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का ? चला जाणून घेऊया.

का खास आहे सूर्यग्रहण ?

शास्त्रज्ञांच्या मते, खग्रास सूर्यग्रहणाचा कालावधी जितका जास्त असतो, तितकं ते दुर्मिळ मानलं जातं. खग्रास सूर्यग्रहण सामान्यतः फक्त काही मिनिटांसाठी दिसते, परंतु 2 ऑगस्ट 2027 या दिवशी, होणाऱ्या ग्रहणामुळे दिवसाच 6 मिनिटे, 20 ते 23 सेकंदांसाठी पूर्ण अंधार पडेल. इतक्या मोठ्या कालावधीचे खग्रास सूर्यग्रहण दशकांत क्वचितच पाहायला मिळतं.

कोणत्या देशात दिसणार अद्भुत नजारा ?

अतिशय ऐतिहासिक असं हे सूर्यग्रहण प्रामुख्याने युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया यांसारख्या देशांना खग्रास सूर्यग्रहणाचे हे नेत्रदीपक दृश्य पाहता येईल.

भारतात दिसणार का सूर्य ग्रहण ?

शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, भारतात हे सूर्यग्रहण पूर्ण रुपात दिसणार नाहीये. मात्र, जगाच्या बहुतेक भागांमध्ये ते खंडग्रास सूर्यग्रहण म्हणून दिसेल. याचा अर्थ असा की, भारतात दिवसा पूर्ण अंधार होणार नसला तरी, चंद्र सूर्याचा मोठा भाग झाकताना दिसेल.

सुतक काळ लागणार ?

ज्योतिषशास्त्रानुसार, खंडग्रास ग्रहण असो वा संपूर्ण ग्रहण, ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुतक काळ सुरू होतो आणि ग्रहण संपेपर्यंत चालू राहतो. मात्र, जर ग्रहण तुमच्या भागातून, देशातून दिसत असेल तरच हे नियम लागू होतात. या शतकातील सर्वात लांब सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे, पण ते पूर्ण स्वरूपात नाही, तर खंडग्रास स्वरूपात दिसेल, त्यामुळे भारतात सुतकाचे नियम पाळले जातील. सुतक काळात मंदिरं बंद राहतात आणि गर्भवती महिलांना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो.

परत कधी मिळणार अशी संधी ?

शास्त्रज्ञांच्या सांगण्यानुसार, इतक्या मोठ्या, दीर्घ कालावधीचे खग्रास सूर्यग्रहण येत्या अनेक दशकांत पुन्हा दिसणार नाही. त्यामुळे, 2 ऑगस्ट 2027 रोजी होणारा हा खगोलीय सोहळा शतकातील सर्वात लांब सूर्यग्रहण म्हणून इतिहासात नोंदवला जाईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत