आपला होणारा पती केतन अग्रवालच्या हत्येसाठी सिया गोयलने लोहगडच का निवडला? धक्कादायक माहिती समोर
पुण्यातील तरुण केतन अग्रवाल याची हत्या त्याचीच होणारी पत्नी सिया गोयलने केली आहे, या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून, सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडलं असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

पुणे जिल्ह्यात असलेल्या लोहगड किल्ल्यावरून पडून 26 वर्षांच्या केतन अग्रवाल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. अवघ्या काही महिन्यांवर केतनचं लग्न आलं होतं. तो त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर फिरण्यासाठी गेला होता, तिथेच ही दुर्घटना घडली. सुरुवातीला केतन फोटो काढण्यासाठी गेला आणि पाय घसरून पडला असाच सर्वांचा समज झाला होता, परंतु त्यानंतर प्रकरणात मोठं ट्विस्ट आलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. केतनची होणारी पत्नी सिया गोयलनचे तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्यासोबत मिळून केतनच्या हत्येचा कट रचना, त्याला आपला वाढदिवसाचं निमित्त करून लोहगडावर बोलावलं आणि संधी मिळताच त्याला लोहगडावरून खाली ढकलून दिलं. केतन 400 फूट दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 18 जून रोजी ही घटना घडी आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, सिया गोयलने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला?
एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार लोहगड किल्ला हा त्या परिसरातील इतर ठिकाणांपेक्षा तब्बल 600 फूट उंच आहे. या किल्ल्याचं बांधकाम उभ्या दगडांमध्ये असून, या किल्ल्याच्या परिसरात अनेक खोल दऱ्या आहेत. एवढंच नाही तर या किल्ल्यावर असे अनेक भाग आहेत, जिथे पर्यटक देखील सहसा फिरकत नाहीत, सुनसान असतात. अशा ठिकाणावरून केतनला धक्का देणं हे खूप सोप काम होतं. तसेच ठरलेल्या प्लानिंगनुसार तसा बनाव करणं देखील फार सोप होतं, या सर्वांचा विचार करून सिया गोयलने आपल्या होणाऱ्या पतीच्या हत्येसाठी लोहगडची निवड केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे प्रकरण सध्या राज्यभर चांगलच गाजत आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल हे आपल्या मुलाच्या आठवणीने व्याकूळ झाले आहेत. माझा मुलगा माझ्या म्हातारपणाचा आधार होता, मला अशी आशा होती, की माझा मुलगा आयुष्यभर माझ्यासोबत राहील, परंतु माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेण्यात आला आहे, अशा शब्दात केतनच्या वडिलांनी विशाल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
