बीसीसीआयने मनात नसतानाही गंभीरला बनवले कोच? व्हीव्हीएस लक्ष्मणचा धक्कादायक खुलासा
2023 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, टीम इंडियाला अंतिम सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे अब्जावधी भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले. या मोठ्या स्पर्धेसोबतच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. द्रविडचा कार्यकाळ नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला. यामागे गौतम गंभीर नव्हे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण होते.

2023 मध्ये, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, टीम इंडियाला अंतिम सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे मायदेशात एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे अब्जावधी भारतीय चाहत्यांचे स्वप्न भंगले. या मोठ्या स्पर्धेसोबतच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. द्रविडचा कार्यकाळ नंतर आणखी एका वर्षासाठी वाढवण्यात आला. यामागे गौतम गंभीर नव्हे, तर व्हीव्हीएस लक्ष्मण होते. लक्ष्मण यांनी आता एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे, की ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनणार हे जवळपास निश्चित होते, परंतु त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे ही जबाबदारी नाकारली.
राहुल द्रविड टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून, व्हीव्हीएस लक्ष्मण बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 2023 मध्ये जेव्हा द्रविडचा कार्यकाळ संपला, तेव्हा त्यांनी जय शाह यांच्याशी संवाद साधला होता. लक्ष्मणने आता एका मीडिया मुलाखतीत हे उघड केले आहे, तो म्हणाला, “मी 2023 मध्ये मुख्य प्रशिक्षक होणार होतो, पण वैयक्तिक कारणांमुळे मी ते पद नाकारले.” जय शाह आणि बीसीसीआयने माझ्या चिंता समजून घेतल्या आणि मला सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) मोकळेपणाने काम करण्याचे स्वातंत्र्य दिले. मी बोर्डाला वचन दिले होते की, जरी मी मुख्य प्रशिक्षक होत नसलो तरी, मी सेंटर ऑफ एक्सलन्सची भक्कमपणे स्थापना करेन.
माजी भारतीय कसोटी विशेषज्ञ फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने 2021 मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून, लक्ष्मण CoE चे प्रमुख आहेत आणि भारतीय क्रिकेटसाठी प्रतिभा घडवण्याचे काम करत आहेत. टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंबाबत लक्ष्मणने हे स्पष्ट केले की, CoE केवळ खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी तयार करण्याचे कामही करते.
लक्ष्मणने 2023 मध्ये टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार दिल्यानंतर, द्रविडचा कार्यकाळ 2024 च्या टी-20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला. त्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. गंभीरच्या कार्यकाळात टीम इंडियाने 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आता 2027 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची सर्वात मोठी जबाबदारी गंभीरच्या खांद्यावर असेल.
