Chanakya Niti : असे धन, सौंदर्य आणि विद्या असते निरर्थक, आचार्य चाणक्य काय सांगतात

| Updated on: May 20, 2021 | 8:16 AM

ज्यांच्याकडे सौंदर्य, ज्ञान आणि संपत्ती आहे (Acharya Chanakya), त्यांच्याकडे सर्वकाही आहे, असा समज आहे. पण, आचार्य चाणक्य यांच्या मते विशिष्ट परिस्थितीत हे तीन गुणही निरर्थक ठरतात.

Chanakya Niti : असे धन, सौंदर्य आणि विद्या असते निरर्थक, आचार्य चाणक्य काय सांगतात
Acharya-Chanakya
Follow us on

मुंबई : ज्यांच्याकडे सौंदर्य, ज्ञान आणि संपत्ती आहे (Acharya Chanakya), त्यांच्याकडे सर्वकाही आहे, असा समज आहे. पण, आचार्य चाणक्य यांच्या मते विशिष्ट परिस्थितीत हे तीन गुणही निरर्थक ठरतात. आचार्य चाणक्य हे खूप मोठे मुत्सद्दी, राजकारणी आणि अभ्यासक होते. त्यांनी आयुष्यातील बर्‍याच घटना बारकाईने समजून घेतल्या आणि त्या आधारावर लोकांना योग्य मार्ग दाखवला, ज्यामुळे त्यांना कठीण परिस्थितींचा सहज सामना करता येईल (Acharya Chanakya Said Beauty Education And Wealth Is Worthless In These Circumstances In Chanakya Niti).

आचार्य यांनी आपल्या कल्पना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चाणक्य नीति नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आजच्या काळातही अचूक असल्याचे सिद्ध होते. सौंदर्य, शिक्षण आणि पैशांबद्दल चाणक्य यांचे धोरण काय आहे, ते जाणून घेऊया –

1. आचार्य चाणक्य म्हणतात की, जगाचे स्वरुप आणि सुंदरता एखाद्या व्यक्तीला आकर्षित करु शकते, परंतु त्याला थांबवू शकत नाही. यासाठी आंतरिक सौंदर्य आवश्यक आहे आणि आंतरिक सौंदर्य हे सदगुणांमधून येत असते. ज्या व्यक्तीचे सौंदर्य सदगुणांरहित आहे, तर त्याला निरर्थक मानले पाहिजे.

2. शिक्षणाच्या मागे काही ध्येय असते, म्हणूनच एखादी व्यक्ती शिक्षण घेते. परंतु ज्याचे शिक्षण ध्येयहीन आहे, त्याचे शिक्षण निरर्थक मानले पाहिजे.

3. धर्मग्रंथात, संपत्तीबाबत असे सांगितले गेले आहे की, मिळवलेल्या पैशांचा दहावा भाग दान-पुण्याच्या कामात खर्च करावा. परंतु काही लोकांना दान करण्याची अजिबात इच्छा नसते. दान केल्याविना मिळविलेले पैसे फार काळ टिकत नाहीत. त्याला व्यर्थ मानले जाते आणि काही काळानंतर त्यांचा नाश होतो.

4. व्यक्तीच्या आचरणाने त्याच्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळते आणि त्याचे आचरण त्याच्या कुटुंबाच्या संस्कांरांची माहिती देते. एखादी व्यक्ती कुठल्याही मोठ्या कुटुंबाशी संबंधित का नसो, परंतु जर त्याचे आचरण चांगले नसेल तर त्याच्या कुटुंबाचा विनाश होणं निश्चित आहे.

Acharya Chanakya Said Beauty Education And Wealth Is Worthless In These Circumstances In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : कोणाचीही पारख करताना या 4 गोष्टींकडे लक्ष द्या, कधीही होणार नाही धूळफेक

Chanakya Niti | या 6 सवयींमुळे घरात येते दारिद्र्य, देवी लक्ष्मी होते नाराज, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा…