AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | या 6 सवयींमुळे घरात येते दारिद्र्य, देवी लक्ष्मी होते नाराज, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा…

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्राचे जाणकार मानले जातात. त्यांची धोरणे अवलंबून अनेक राजांना सत्ता आणि अधिकार प्राप्त झाले. त्यांची धोरणे आयुष्यात यशस्वी व्यक्ती होण्याचे गुण शिकवतात.

Chanakya Niti | या 6 सवयींमुळे घरात येते दारिद्र्य, देवी लक्ष्मी होते नाराज, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा...
Acharya Chanakya
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 17, 2021 | 8:46 AM
Share

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) हे नीतिशास्त्राचे जाणकार मानले जातात. त्यांची धोरणे अवलंबून अनेक राजांना सत्ता आणि अधिकार प्राप्त झाले. त्यांची धोरणे आयुष्यात यशस्वी व्यक्ती होण्याचे गुण शिकवतात. आचार्य चाणक्य यांची गणना उत्तम विद्वानांमध्ये केली जाते. चाणक्य हे विष्णुगुप्त आणि कौटिल्य म्हणूनही ओळखले जातात. आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्र, मुत्सद्देगिरी आणि समाजशास्त्र या विषयांत जाणकार मानले जातात (Acharya Chanakya Said These Six Habits Of Human Makes Them Poor In Chanakya Niti).

चाणक्य धोरण एखाद्याला आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्याची कला शिकवते. चाणक्य यांनी आपल्या एका श्लोकात सांगितले की व्यक्तीच्या सवयीमुळे देवी लक्ष्मीची कृपा त्याच्यावर होत नाही. तसेच, असे लोक आर्थिक लाभापासूनही दूर राहातात.

कुचैलिनं दन्तमलोपधारिणं बह्वाशिनं निष्ठुरभाषिणं च।

सूर्योदये चास्तमिते शयानं विमुञ्चतिश्रीर्यदि चक्रपाणि:।।

❇️ आचार्य चाणक्य म्हणतात, जे लोक आपल्या आसपास स्वच्छता ठेवत नाहीत आणि जे स्वच्छ नाहीत त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा नसते. एवढेच नव्हे तर अशा लोकांना समाजात मान-सन्मानही मिळत नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी स्वच्छ कपडे घाला. परिसर स्वच्छ ठेवा.

? या श्लोकात आचार्य चाणक्य असे म्हणतात की, जे लोक दात स्वच्छ करीत नाहीत त्यांना गरीबीचा सामना करावा लागतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी प्रसन्न होत नाहीत. तर, जे दररोज दात स्वच्छ करतात, त्यांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

❇️ जे लोक आपल्या भूकेपेक्षा अधिक जेवण करतात ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत. कारण दारिद्र्य माणसाला गरीब बनवते. ते म्हणाले की जे लोक आवश्यकतेपेक्षा जास्त आहार घेतात ते निरोगी राहत नाहीत.

? चाणक्य म्हणतात की जे लोक कडू शब्द बोलतात ते कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत. जे लोक इतरांना आपल्या बोलण्याने दुखवितात त्यांच्यावर देवी लक्ष्मीची कृपा कधीही होत नाही. तसेच, या लोकांचे मित्र नसतात. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे बरेच शत्रू असतात.

❇️ या व्यतिरिक्त, आचार्य चाणक्य म्हणतात की सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणाऱ्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा नसते. विनाकारण झोप देखील आरोग्यास हानिकारक आहे.

? जे लोक बेईमानी, कपट आणि अन्यायातून पैसे कमवतात त्यांच्याकडे कधीही पैसे नसतात. ते नेहमीच गरीब असतात.

Acharya Chanakya Said These Six Habits Of Human Makes Them Poor In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | व्यक्तीची मती भ्रष्ट करतात हे अवगुण, यांचा त्याग करणेच बरं

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ तीन गुरुमंत्र तुम्हाला लोकांचे प्रिय बनवतील

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...