Chanakya Niti | ही तीन कामं करताना कधीही लाजू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकते

| Updated on: Jul 14, 2021 | 7:46 AM

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा बर्‍याच गोष्टी लिहिल्या आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात सहजपणे अनेक आव्हानांचा सामना करता येतो आणि आपले आयुष्य अधिक चांगले बनवता येते. या तीन गोष्टींविषयी येथे जाणून घ्या ज्याबद्दल आचार्य यांनी कधीही लाज वाटू नये असा सल्ला दिला आहे, अन्यथा त्या व्यक्तीला स्वतःला त्रास होतो.

Chanakya Niti | ही तीन कामं करताना कधीही लाजू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकते
Chanakya Niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी आणि एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. त्यांना मौर्य समाजाचे संस्थापक म्हणतात. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या बुद्धी कौशल्याने एका सामान्य मुलाला सिंहासनावर बसवले. आचार्य चाणक्य यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला, परंतु त्यांनी परिस्थीतींना कधीही कधीही त्यांच्यावर वर्चस्व गाजवू दिलं नाही (Acharya Chanakya said do not feel shy in these three things you might get trouble due to this ).

त्यांनी प्रत्येक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातील संधी शोधून काढली. त्यांनी लोकांना नेहमीच त्यांचे ज्ञान आणि अनुभवाने मदत केली. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा बर्‍याच गोष्टी लिहिल्या आहेत ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला आयुष्यात सहजपणे अनेक आव्हानांचा सामना करता येतो आणि आपले आयुष्य अधिक चांगले बनवता येते. या तीन गोष्टींविषयी येथे जाणून घ्या ज्याबद्दल आचार्य यांनी कधीही लाज वाटू नये असा सल्ला दिला आहे, अन्यथा त्या व्यक्तीला स्वतःला त्रास होतो.

उधार दिलेले पैसे

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल तर ते परत मागण्यात कधीही लाज बाळगू नका. कोणताही संबंध मध्यभागी येऊ देऊ नका. कारण, पैशांच्या बाबतीत जर तुम्हाला लाज वाटली तर त्याचे नुकसान तुम्हाला सहन करावे लागेल. लक्षात ठेवा, आपण फक्त आपण दिलेला पैसाच परत मागत आहात, दुसर्‍याचा नव्हे, मग त्यात लाज आणि संकोच कशाला?

जेवण करण्यात

अन्न नेहमी पोटभर खावे, असं म्हणतात. परंतु जेव्हा काही लोक नातेवाईक किंवा मित्रांच्या घरी जातात तेव्हा ते संकोच करतात आणि प्रकारे न खाता अर्ध्या भरलेल्या पोटाने उठतात. असं करु नये. जर आपण जेवायसाठी बसला असाल तर पोटभरुन खा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाज वाटून घेऊ नका.

गुरुकडून ज्ञान घेताना

जर आपण एखाद्या गुरुकडून ज्ञान घेत असाल तर कधीही लाज वाटून घेऊ नका, नेहमी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक राहा. कारण ज्ञान जेवढे घ्याल तेवढे कमीच असते. काहींना आपले कुतूहल गुरुपुढे व्यक्त करण्यात संकोच वाटतो, परंतु असे केल्याने आपण स्वत:ला हानी पोहोचवित आहात आणि भविष्यात आपल्याला त्यामुळे समस्येचा सामना करावा लागू शकतो. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न विचारुन उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि आपले कुतूहल शांत करा.

Acharya Chanakya said do not feel shy in these three things you might get trouble due to this

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले तुमचं जीवन बदलू शकतात…

Chanakya Niti | या 4 जणांपुढे कधीही पैशांबाबत बोलू नये, अन्यथा आपण मोठ्या संकटात पडू शकता