AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले तुमचं जीवन बदलू शकतात…

आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) आयुष्यभर लोकांना आपल्या अनुभवांद्वारे मार्गदर्शन करत राहिले. चाणक्य नीतिमध्ये अशा बर्‍याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, ज्याचे अनुसरण करुन व्यक्ती सहजपणे सर्वात मोठे आव्हानही स्वीकारु शकते आणि त्यांचे जीवन आनंदी बनवू शकते.

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांचे 'हे' सल्ले तुमचं जीवन बदलू शकतात...
Chanakya Niti
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 7:24 AM
Share

मुंबई : महान पंडित आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांना त्यांच्या जीवनात अनेक संघर्षांना सामोरे जावे लागले. परंतु या संघर्षांना त्याने कधीही स्वत: वर अधिराज्य गाजवू दिले नाही. तर, त्यांच्याकडून शिकून त्यांनी स्वत:ला सुधारण्याचे काम केले. आचार्य चाणक्य आयुष्यभर लोकांना आपल्या अनुभवांद्वारे मार्गदर्शन करत राहिले. चाणक्य नीतिमध्ये अशा बर्‍याच गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, ज्याचे अनुसरण करुन व्यक्ती सहजपणे सर्वात मोठे आव्हानही स्वीकारु शकते आणि त्यांचे जीवन आनंदी बनवू शकते. आचार्य यांनी सांगितलेल्या काही खास गोष्टी येथे जाणून घ्या (Acharya Chanakyas These Things Will Change Your Life According To Chanakya Niti) –

? जिच्या चेहऱ्यावर तुमच्यासाठी नेहमीच द्वेष असतो अशा बायकोपासून दूर राहावे आणि जे नातेवाईक प्रेम देऊ शकत नाहीत त्यांच्यापासूनही नेहमीच अंतर ठेवले पाहिजे.

? प्रत्येकाला आपले दु:ख, वेदना कधीही सांगू नका. आपले ऐकल्यानंतर बरेच लोक आपल्याला सांत्वन करतील, परंतु पाठ फिरताच ते आपली चेष्टा करण्यास सुरुवात करतील.

? जोपर्यंत आपले शरीर निरोगी आहे आणि आपण कोणतेही कार्य करण्यास सक्षम आहात तोपर्यंत आत्म-प्राप्तीसाठी उपाय करा. कारण मृत्यूनंतर कोणीही काहीही करु शकत नाही.

? आपला आयुष्यात झालेला अपमान कोणाबरोबरही शेअर करु नये. अशा अप्रिय घटना इतरांसाठी करमणूकीचे साधन असतात आणि ते आपली चेष्टा करतात.

? एखाद्याने आपल्या घरच्या गोष्टी कोणाबरोबरही कधीही शेअर करु नये. कारण, घराची बाब एखाद्या बाहेरील व्यक्तीला सांगितल्याने त्याला घरातील प्रत्येक लहान गोष्ट माहित होते आणि याचा फायदा घेत तो घरात वाद निर्माण करु शकतो.

? लोभ एखाद्या व्यक्तीला कोणत्याही पातळीवर घेऊन जाऊ शकतो आणि काहीही घडवू शकतो, जे त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करु शकते.

? इतरांचे वाईट केल्याने आपले स्वतःचे विचारच केवळ प्रदूषित होत नाहीत तर आपला वेळही व्यर्थ जातो. म्हणूनच एखाद्याने इतरांवर कधीही टीका करु नये. त्याऐवजी आपल्या स्वतःच्या उणिवा सुधारण्याचा प्रयत्न करा.

? यश हा माणसाचा सर्वोत्कृष्ट अलंकार आहे, म्हणून प्रत्येक व्यक्तीने समाजात अशा गोष्टी केल्या पाहिजेत ज्यामुळे त्याचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

Acharya Chanakyas These Things Will Change Your Life According To Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशा परिस्थितीमध्ये पत्नी आणि भावंडांसह या लोकांचा त्याग केलेलाच बरा

Chanakya Niti | व्यक्तीच्या 100 गुणांना निष्फळ करतो हा एक अवगुण, याचा त्याग केलेलाच बरा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.