AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईलवर अश्लील कंटेन्ट पाहण्याचे व्यसन लागलंय, तर वेळीच व्हा सावध, राजेंद्र दास महाराज काय म्हणाले ? पाहा

आजच्या काळात मोबाईल अन्न,वस्र आणि निवारा सोबतच स्मार्टफोन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. आपला मोबाईल फोन देखील आपल्या वागणूकीवर परिणाम करु शकतो.जेव्हा आपण आपल्या फोनवर अश्लील कंटेन्ट पाहतो तेव्हा काय होते हे महाराज राजेंद्र दास महाराजांकडून जाणून घ्या.

मोबाईलवर अश्लील कंटेन्ट पाहण्याचे व्यसन लागलंय, तर वेळीच व्हा सावध, राजेंद्र दास महाराज काय म्हणाले ? पाहा
Rajendra Das Maharaj
| Updated on: Feb 06, 2026 | 6:40 PM
Share

आज काल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून बँकांपासूनचे सर्व व्यवहार मोबाईलद्वारे करता येत आहेत. माहिती घेणे, अभ्यास करणे, ऑफीसचे काम आणि मनोरंजन यासाठी मोबाईलची स्क्रीन वारंवार पाहिली जात आहे. मात्र,याचा विघातक वापर देखील होत असतो. वारंवार अश्लिल कंटेन्ट पाहात राहण्यात आपला बहुमोल वेळ आणि पैसा वाया जात आहे. अनेकदा लोक विचार करतात की केवळ पाहिल्याने काय होणार आहे ? त्याने काय फरक पडणार आहे ? परंतू हा मोठा गैरसमज आहे.

वृंदावन स्थित मलूक पीठाचे पीठाधीश्वर श्री राजेंद्र दास जी महाराज यांचे यावरील एक मत व्हायरल होत आहे. त्यांच्या दृष्टीने मानवाचे डोळे, कान आणि मन वारंवार जे ग्रहण करते तसेच त्याचे चरित्र बनत जाते.

डोळे आणि मनाचे थेट संबंध

आम्ही जे तुमचे डोळे पाहातता, त्याचे प्रतिबिंब आपल्या मनात उतरते. अश्लील व्हिडीओ पाहिल्याने मेंदूत तेच विचार फिरत रहातात. नंतर तेच विचार सवयीत परिवर्तित होतात. आणि व्यवहारात देखील तुम्ही तसेच वागू लागता. अशी माणसे बाहेरुन सामान्य वाटतात. परंतू आतून मानसिक रुपाने कमजोर आणि बेचैन होऊन जातात.

लोक म्हणतात की आम्ही तर देवाची भक्ती करत राहायला हवी म्हणजे सर्व काही ठीक होऊन जाईल, परंतू महाराज राजेंद्रदास जी यांच्या मते जी व्यक्ती संपूर्ण दिवसभर घाणेरडे विचार करतात. आणि रात्रीत देवाच्या भक्तीचे नाटक करतात. त्यांचे मन कधीच शुद्ध होत नाही.

पुराणातील अजामिलची कथा

भागवत पुराणात अजामिलची कथा आहे, ज्यात म्हटले आहे की एकेकाळी एक पवित्र ब्राह्मण रहात होता. परंतू त्याने डोळ्यांनी चुकीच्या गोष्टी पाहील्या आणि कानांनी चुकीच्या गोष्टी ऐकल्या आणि अखेर त्याचे पतन सुरु झाले. सांगण्याची गोष्ट  स्पष्ट आहे की पतन नेहमी कर्माने नव्हे तर नजरेने सुरु होते.

5  इंद्रियांचा पवित्र आहार

राजेंद्रदास महाराजजी यांच्या मते कानांनी तेच ऐकावे जे चांगले असेल

नाकाने देवाशी संबंधित गोष्टीच्या सुंगधांचा आनंद घ्या

जीभने प्रसाद आणि नाम कथेचा आनंद घ्या

आणि स्पर्श तोच असावा जो मर्यादित असेल

जेव्हा हे 5 इंद्रिये घाणेरडी गोष्टी ग्रहण करतात, तेव्हा आत्मा कमजोर होते.

मोबाईलचे व्यसन एक अदृश्य जाळे

अश्लील व्हिडियो पाहिल्याने केव्हा याचे सवयीत रुपांतर होईल हे तुम्हालाही कळणार नाही. याच प्रकारचे अश्लील चलचित्रांना पाहिल्याने वेळ बर्बाद होण्यासह मेंदूही थकतो आणि नात्यात दुरावा तयार होतो.

मोबाईल फोन वाईट गोष्ट नाही, परंतू त्याचा गैरवापर माणसाला आतून तोडून कमजोर करतो. जर खरंच जीवनात भक्ती, शांती आणि स्थिरता हवी असेल तर सर्वात आधी डोळ्यांचा मार्ग साफ करा, जे पाहायला हवे तेच पहा, उर्वरित सर्वांना नजरअंदाज करणेच असली साधना आहे.

( Disclaimer: ही माहिती मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी बेवसाईट यास दुजारो देत नाही. कोणतीही माहिती वा मान्यता अमलात आणण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )

अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.