AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aja Ekadashi 2022: आज अजा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि धार्मिक महत्त्व

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी, ज्याला सनातन परंपरेत अजा एकादशी म्हणून ओळखले जाते, ती सर्व पापे दूर करते आणि अश्वमेध यज्ञाप्रमाणेच (Aswamedh Yadnya) फल देते असे मानले जाते.

Aja Ekadashi 2022: आज अजा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धती आणि धार्मिक महत्त्व
गुरुवारचे उपाय Image Credit source: Social Media
| Edited By: | Updated on: Aug 22, 2022 | 6:23 AM
Share

Aja Ekadashi 2022: हिंदू धर्मात, एकादशी, जी प्रत्येक महिन्यात दोनदा येते, म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात, भगवान विष्णूची उपासना, जप आणि उपवास करण्यासाठी अतिशय शुभ आणि शीघ्र फलदायी मानली जाते. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात येणारी एकादशी, ज्याला सनातन परंपरेत अजा एकादशी म्हणून ओळखले जाते, ती सर्व पापे दूर करते आणि अश्वमेध यज्ञाप्रमाणेच (Aswamedh Yadnya) फल देते असे मानले जाते. अजा एकादशी केल्यावर, साधकाला एकाच वेळी अनेक मोठ्या तीर्थांचे  पुण्य प्राप्त होते आणि देवी लक्ष्मी व भगवान विष्णूंचा (Bhagwan Vishnu) आशीर्वाद प्राप्त होतो. या व्रताची पद्धत, शुभ वेळ आणि धार्मिक महत्त्व विस्तृतपणे जाणून घेऊया.

अजा एकादशीचा शुभ मुहूर्त

भगवान विष्णूचा आशीर्वाद देणारी एकादशी तिथी उद्या  22 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे 03:35 पासून सुरू होईल आणि 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 06:06 पर्यंत चालू राहील. एकादशीचा व्रत सूर्योदयापासून पुढच्या सूर्योदयापर्यंत ठेवला जातो आणि व्रताचे पूर्ण फळ मिळावे म्हणून विधीपूर्वक व्रत पाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर शुभ मुहूर्तावर तो सोडला जातो. पंचांगानुसार, ऑगस्ट महिन्यात येणारे अजा एकादशी व्रत 23 ऑगस्ट 2022 रोजी पाळले जाईल आणि त्याचे पारण 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 05:55 ते 08:30 पर्यंत केले जाऊ शकते.

अजा एकादशी व्रत पूजा पद्धत

सर्व दु:ख दूर करणारे आणि सुख व सौभाग्य देणारे अजा एकादशीचे व्रत पाळण्यासाठी साधकाने एक दिवस आधीपासून व्रताचे नियम पाळायला सुरुवात करावी. म्हणजेच एक दिवस आधीपासून भात खाऊ नये. व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून ध्यान करून सूर्यनारायणाला जल अर्पण केल्यानंतर पिवळी फुले, पिवळे वस्त्र, पिवळी फळं आणि पिवळे मिष्ठान्न अर्पण करून भगवान विष्णूची पूजा करावी. यानंतर अजा एकादशी व्रताची कथा ऐकावी आणि शेवटी भगवान विष्णूला नैवैद्य अर्पण करून त्याचे वाटप करावे.

जा एकादशी व्रताची कथा

पौराणिक मान्यतेनुसार, एकेकाळी हरिश्चंद्र नावाच्या चक्रवर्ती राजाने काही कारणास्तव आपला महाल सोडला आणि आपल्या कुटुंबासह चांडालकडे काम करू लागला. जिथे एक दिवस सर्व दु:ख सोसत असताना, त्यातून मुक्त होण्याच्या चिंतेत तो हरवला होता, तेव्हाच गौतम ऋषी तिथून निघून गेले. तेव्हा राजाने त्याला प्रणाम केला आणि त्याच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग विचारला. त्यावेळी गौतम ऋषींनी त्या राजाला भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अजा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. त्यानंतर राजाने विधिवत हे पवित्र व्रत केले, ज्याच्या कृपेने केवळ त्याचे सर्व दुःख दूर केले नाही तर त्याचा गमावलेला राजमहालही मिळवला.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.