AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्व

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो.

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही ही कामं करु नये, जाणून घ्या या दिवसाचं महत्व
Akshaya tritiya
| Updated on: May 14, 2021 | 8:52 AM
Share

मुंबई : अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात. या दिवशी सोने-चांदी खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते (Akshaya Tritiya 2021 Do Not Do These Things On This Day).

हिंदू दिनदर्शिकेनुसार, अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी गृह प्रवेश, लग्न इत्यादी शुभ कार्ये केली जातात. यावेळी अक्षय्य तृतीया 14 मे रोजी पडत आहेत. या दिवशी काय करु नये हे जाणून घेऊया. ज्यामुळे देवी लक्ष्मी रागावू शकते.

स्नान केल्याशिवाय तुळशीची पाने तोडू नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. भगवान विष्णूला तुळशीची पाने अत्यंत प्रिय आहेत. या दिवशी स्नान न करता तुळशीची पाने तोडू नका. असे केल्याने देवी लक्ष्मी रागावते, अशी मान्यता आहे.

रागावू नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी उपवास ठेवणाऱ्यांनी रागापासून दूर राहावं. असे मानले जाते की, असे केल्याने उपासना यशस्वी होत नाही. या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका. अशाप्रकारच्या वाईट सवयी टाळा.

रिकाम्या हाताने घरी जाऊ नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्या-चांदीने बनवलेले काहीतरी विकत घेतले पाहिजे. आपण सोने खरेदी करु शकत नसल्यास कोणतीही धातूची वस्तू खरेदी करा.

बांधकाम करु नये

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवीन घर खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु या दिवशी कोणत्याही प्रकारचे बांधकाम करणे अशुभ मानले जाते.

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

मान्यतेनुसार, या दिवशी प्रत्येक काम करण्यात तुम्हाला यश मिळेल. देवी पार्वतींनी स्वतः धर्मराजांना ही गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या होत्या, जी कोणी व्यक्ती अक्षय्य तृतीयेच्या दिवशी विधीवत भगवान विष्णू आणि देवी पार्वतीची पूजा करेल, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. नि:संतान लोकांना संतान प्राप्ती होते.

Akshaya Tritiya 2021 Do Not Do These Things On This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Parshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व, उपासना करण्याची पद्धत जाणून घ्या !

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.