AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

RSS : मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी टॅरिफवर आरएसएसची भूमिकाही स्पष्ट केली.

टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
Mohan Bhagwat RSS
| Updated on: Feb 07, 2026 | 9:16 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संवाद कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना आरएसएसचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अमेरिकन टॅरिफबद्दलही संघाची भूमिका स्पष्ट केली. टॅरिफबद्दल मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे – भागवत

टॅरिफच्या मुद्द्यावर बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपण जगापासून अलिप्त राहू शकत नाही, परंतु जर आपण व्यवहार केले तर आपण ते स्वेच्छेने करू. आपण कोणाच्याही दबावाखाली असे करणार नाही किंवा टॅरिफवर आधारित निर्णय घेणार नाही. आपण जे काही खरेदी करतो ते आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करेल. आपण स्वदेशी स्वीकारले पाहिजे. जिथे परदेशात जाण्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरा पर्याय नाही तिथे परदेशी वस्तू वापरता येतात. धोरण पातळीवर, आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यवहार करावे लागतात. धोरण हळूहळू पुढे जात आहे. धोरण बदलते आणि स्वतःच्या गतीने प्रगती करेल, परंतु देशांतर्गत पातळीवर, आपण स्वदेशी लागू करू.

संघाचं काम कसं आहे?

संघाच्या कामावर बोलताना भागवत म्हणाले की, संघाच काम हे वेगळं काम आहे. पूर्ण जगात असं काम नाही असं आधी आम्ही म्हणायचो, आता आम्ही काम करत असताना देखील अनुभवत आहोत. जगातील लोकं संघाचं काम पहायला येत आहेत. आफ्रिका, अमेरिका, कोरिया या देशातील लोकं म्हणतात तुमच्या कामा प्रमाणे आम्हाला आमच्या देशात युवकांसाठी काम करायचं आहे, आपण आम्हाला ते शिकवाल का? तथागत बुद्धांनंतर असं काम कुणी केलेलं नाही. असं काम करणारा दुसरा कोणी उपलब्धच नाही. आकाश कसं आहे तर आकाशा सारखा आहे दुसर उदाहरण नाही. समुद्र कसा आहे समुद्रा सारखा आहे दुसरं उदाहरण नाही. अगदी असंच संघाचं काम आहे.

संघाचं काम संघासाठी नसून संपूर्ण देशासाठी आहे

मोहन भागवत आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, ‘संघाला इतर पक्ष आहे, विचारधारा यासोबतच जोडू पाहत आहेत ते चुकीच आहे. संघाला वरून आणि लांबून पाहाल तरी सुद्धा गैरसमज निर्माण होतात. संघ कवायती करतो परंतु संघ पॅरामिलिट्री ऑर्गनायझेंशन नाही. संघाचे स्वयंसेवक लाठी काठी शिकतात परंतु ते कोणताही आखाडा नाही. संघ अखिल भारतीय संगीत शाळा नाही संघाचे स्वयंसेवक राजकारणात आहेत मात्र संघ राजकीय पक्ष नाही. काही गोष्टी वरून पाहिल्या की गैरसमज निर्माण होतो त्यामुळे संघाला आतून जाणून घेणे गरजेचे आहे. साखर कशी आहे हे अनुभवायला केवळ एक चमचा साखर खाल्ली तरी कळत साखर कशी आहे. परंतु असं काही खायचं असेल तर त्याची परीक्षा घेणे गरजेचे नाही एवढ तरी कळायला हवं. यामुळे 100 वर्षानंतर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की संघ काय आहे? संघाच काम हे संघासाठी नाही ते संपूर्ण देशासाठी आहे.’

संघाला प्रसिद्धी नको आहे

पुढे बोलताना भागवत म्हणाले की,’संघ काय आहे हे जाणून घेण्यासाठी संघ काय नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. संघ दुसऱ्या कोणत्याही संघटनेसोबत स्पर्धा करण्यासाठी निघाला नाही आणि जाणार ही नाही. संघ कोणत्या विशिष्ट परिस्थितीत प्रतिक्रिया म्हणून निर्माण झालेला नाही. संघ कोणाच्या विरोधात चाललेला नाही. संघच काम कोणाचा ही विरोध न करता काम करत चालत राहणारा आहे. संघाला प्रसिद्धी नको आहे. संघाला ताकद नको आहे. संघ जी देशात चांगली कामे सुरू आहेत ती पूर्ण करण्यासाठी काम करत आहे.’

Follow Us
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…