AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातल्या या ठिकाणी आहे सोंड नसलेल्या गणपतीचे मंदिर, असे मंदिर का बांधण्यात आले?

जयपूरची पायाभरणी करताना बालरूप गणेशाची मूर्ती बनवून पूजा करण्यात आली. याच गणपतीची मूर्ती शहराच्या उत्तरेकडील अरवलीच्या टेकडीवर किल्ला (गड) बांधून विराजमान करण्यात आली.

भारतातल्या या ठिकाणी आहे सोंड नसलेल्या गणपतीचे मंदिर, असे मंदिर का बांधण्यात आले?
गणपतीImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 26, 2023 | 6:17 PM
Share

मुंबई : जयपूर शहरातील अरवली पर्वतरांगांवर असलेले देशातील एकमेव मंदिर, जिथे सोंडेशिवाय गणेशाची मूर्ती (Arawali Ganesh Mandir) आहे. हे मंदिर गड गणेश या नावाने प्रसिद्ध आहे. 18व्या शतकात जयपूरच्या स्थापनेसाठी सवाई जयसिंग यांनी गुजरातमधून खास पंडितांना बोलावून अश्वमेध यज्ञ केला होता. जयपूरची पायाभरणी करताना बालरूप गणेशाची मूर्ती बनवून पूजा करण्यात आली. याच गणपतीची मूर्ती शहराच्या उत्तरेकडील अरवलीच्या टेकडीवर किल्ला (गड) बांधून विराजमान करण्यात आली. सवाई जयसिंग आणि यज्ञ करणार्‍या पुजाऱ्यांचा असा विश्वास होता की यामुळे श्री गणेशाची नजर संपूर्ण शहरावर राहील. त्यांचे आशीर्वाद मिळतील.

मंदिरापर्यंत जाण्यासाठी रोज एक पायरी बांधण्यात आली

तज्ञांच्या मते, सुमारे 500 फूट उंचीवर बांधलेल्या गड गणेश मंदिरापर्यंत जाण्यासाठी दररोज एक पायरी बांधली जात होती. अशा प्रकारे, प्रत्येक सगळ्या पायऱ्या बांधण्यासाठी संपूर्ण 365 दिवस लागले. आजही बाप्पाच्या मंदिरात भक्त दूरवरून येतात. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला सोंड नाही, कारण तो बाल रूपात आहे.

300 वर्षांनंतरही गाभाऱ्यातला फोटो नाही

या मंदिराच्या स्थापनेनंतर येथे छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचे कधीही छायाचित्रण करण्यात आले नव्हते. अशा स्थितीत मंदिराच्या स्थापनेला जवळपास 300 वर्षे उलटून गेल्यानंतरही श्रीगणेशाचा एकही फोटो उपलब्ध नाही. भक्तांना फक्त दर्शन घेता येते.

सिटी पॅलेसच्या गच्चीवरून महाराज करायचे आरती

मंदिराची खास गोष्ट म्हणजे सवाई जयसिंगच्या वास्तुविशारदांनी हे मंदिर अशा ठिकाणी बांधले की, राजा सिटी पॅलेसमधून उभा राहून दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या आरतीच्या वेळी मंदिर पाहू शकत होते. गड गणेश, गोविंद देव मंदिर, सिटी पॅलेस आणि अल्बर्ट हॉल हे टेकडीवर एकाच दिशेने एकमेकांना समांतर बांधले गेले. नियमित भेट देणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की गढ गणेशाकडून मागितलेली प्रत्येक इच्छा बुधवारच्या सात वाऱ्या केल्याने पूर्ण होते. मंदिराच्या आवारात पायऱ्या चढताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन उंदीरही बसवले आहेत, ज्यांच्या कानात भाविक आपली इच्छा सांगतात. उंदीर त्या प्रार्थना बाल गणेशापर्यंत पोहचवतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.