Conjugal Happiness Remedy : ज्योतिषशास्त्रातील या उपायांनी वैवाहिक जीवन अधिक आनंदी होईल

| Updated on: Oct 06, 2021 | 2:25 PM

प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचं वैवाहिक जीवन नेहमी आनंदी असावे. यासाठी, त्याला एक योग्य जीवनसाथी सापडतो आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रत्येक सुख आणि सोयीची व्यवस्था करतो. जेणेकरुन त्याच्या घरातील आनंद वाढवा. असे म्हटले जाते की, कौटुंबिक जीवन कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो.

Conjugal Happiness Remedy : ज्योतिषशास्त्रातील या उपायांनी वैवाहिक जीवन अधिक आनंदी होईल
happy married life
Follow us on

मुंबई : प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचं वैवाहिक जीवन नेहमी आनंदी असावे. यासाठी, त्याला एक योग्य जीवनसाथी सापडतो आणि त्याच्या कुटुंबासाठी प्रत्येक सुख आणि सोयीची व्यवस्था करतो. जेणेकरुन त्याच्या घरातील आनंद वाढवा. असे म्हटले जाते की, कौटुंबिक जीवन कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. जर कौटुंबिक जीवन आनंदी असेल आणि वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द कायम असेल तर व्यक्ती लवकरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो आणि आयुष्यात सर्वात मोठे यश सहजतेने मिळवतो.

पण, त्याउलट जर त्यांच्या जीवनात विसंवाद आला तर त्यांच्याकडे आयुष्यातील सुखच नाही तर त्या व्यक्तीकडे जे काहीही असेल ते सर्व उध्वस्त होते. जाणून घेऊया काही ज्योतिषीय उपाय जे तुमच्या कुटुंबाच्या आनंदाला वाईट नजरांपासून वाचवेल आणि तुमंच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द कायम ठेवतील.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबाच्या आनंदाला वाईट नजर लागली असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह एखाद्या पवित्र नदी किंवा तलावामध्ये स्नान करावे. हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबाशी संबंधित सर्व वाईट शक्ती नदीच्या पाण्यात वाहून जातील आणि कुटुंब, पती-पत्नीमध्ये प्रेम वाढेल.

सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:’ या मंत्राचा जप करा. तसेच, आपल्या बेडरुममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावा.

जर कोणत्याही कारणाशिवाय कुटुंबातील सदस्य किंवा पती-पत्नीमध्ये नेहमीच तणाव राहात असेल तर गुरुवारी केस आणि दाढी-मिशा कापू नका.

जर कोणत्याही कारणाशिवाय पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर त्या पती-पत्नीने लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे सुखी वैवाहिक आयुष्यावर एखाद्या स्त्रीमुळे परिणाम होत असेल आणि घरात नेहमीच कलह होत असेल. तर त्या स्त्रीमुळे उत्पन्न झालेला दोष दूर करण्यासाठी चंद्रमणी जडलेली चांदीची अंगठी शुक्लपक्षात सोमवारी अनामिकेत घाला.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

करिअरमध्ये नैराश्य येतेय का? मग हे उपाय नक्की करून पहा

PHOTO | Astro Tips : पाण्याशी संबंधित हे 4 उपाय तुमचे दुर्दैव सौभाग्यमध्ये बदलू शकतात !