AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात असे लोक साप, विंचवापेक्षाही विषारी असतात; त्यांच्यापासून लांब राहण्यातच हीत

आर्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या स्वभावाचे काही दोष सांगितले आहेत, ते म्हणतात की अशा लोकांपासून लांब राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण असे लोक साप आणि विंचवापेक्षाही विषारी असतात.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात असे लोक साप, विंचवापेक्षाही विषारी असतात; त्यांच्यापासून लांब राहण्यातच हीत
| Updated on: May 02, 2025 | 10:04 PM
Share

आचार्य चाणक्य हे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ, कुटनीतीतज्ज्ञ, राजनीतीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. त्यांनी एका सामान्य मुलाला चंद्रगुप्त मौर्य यांना आपल्या कुटनीतीच्या बळावर मगधसारख्या शक्तिशाली राज्याचा राजा बनवलं अशी आख्यायिका आहे. आर्य चाणक्य हे केवळ कुटनीतीतज्ज्ञच नव्हते तर त्यांचा समाजातील प्रत्येक घटकाचा अभ्यास होता. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये आर्य चाणक्य यांनी समाजाच्या प्रत्येक पैलूवर लिखाण केलं आहे. हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरत आहे.

आर्य चाणक्य यांनी व्यक्तीच्या स्वभावाचे काही दोष सांगितले आहेत, ते म्हणतात की अशा लोकांपासून लांब राहण्यातच तुमचं हीत आहे, कारण असे लोक साप आणि विंचवापेक्षाही विषारी असतात. जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल

चतुर आणि लालची लोक

चाणक्य म्हणतात की जे लोक दुसर्‍याच्या प्रगतीवर जळतात, स्वार्थी असतात अशा लोकांपासून दूर राहण्यातच तुमचं हीत आहे, तुमच्यावर कितीही कठीण परिस्थिती असली तरी देखील अशा लोकांकडे तुम्ही कधीच मदत मागवू नका. कारण असे लोक स्वत:च्या स्वार्थासाठी तुमचं नुकसान करू शकतात.

अभिमानी व्यक्ती

चाणक्य म्हणतात की ज्या लोकांना फुकटचा अभिमान असतो, अशा लोकांपासून चार हात दूरच राहा. असे लोक आपल्या शुल्लक अभिमानासाठी तुमच्या मैत्रिचा विश्वासघात करण्यास देखील मागे पुढे पाहत नाहीत, ते तुम्हाला धोका देऊ शकतात.

रागीट लोक 

आर्य चाणक्य म्हणतात ज्या लोकांचा स्वभाव हा रागीट असतो. त्यांच्यापासून दूर राहण्यातच हीत असतं. असे लोक शुल्लक कारणांवरून देखील तुमच्यावर चिडू शकतात. असे लोक रागाच्या भरात अनेकदा चुकीचे निर्णय घेत असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहिलेलंच चांगलं. असे लोक तुमचं मोठं नुकसान करू शकतात. त्यामुळे तुम्हाला कितीही मदतीची गरज असेल तरी अशा लोकांना मदत मागू नका.

डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा
Uddhav Thackeray UNCUT | उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाच्या रणांगणात! पत्रकार परिषदेत मोठी घोषणा; येत्या रविवारी...