AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात कुटुंबप्रमुखाच्या या 4 सवई करतात घर बरबाद

चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये घरातील कुटुंब प्रमुख कसा असावा? त्याच्यामध्ये काय गुण असावेत? याबद्दल चाणक्य यांनी आपले विचार मांडले आहेत.

Chanakya Niti : चाणक्य म्हणतात कुटुंबप्रमुखाच्या या 4 सवई करतात घर बरबाद
| Updated on: Aug 20, 2025 | 12:41 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना आपलं आयुष्य जगत असताना प्रेरणा देतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये एक आदर्श कुटुंब कसं असावं? या बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. कुटुंबातील नाती कशी असावीत? एकमेकांचा एक दुसऱ्याबरोबर व्यवहार कसा असावा? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? कुटुंब प्रमुखानं घर कसं संभाळावं अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

दरम्यान चाणक्य यांनी घरातील कुटुंब प्रमुखाच्या अशा काही सवई सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या सवई जर कुटुंबप्रमुखाला असतील तर त्याने वेळीच सुधारलं पाहिजे, अन्यथा संपूर्ण घर बरबाद होण्यास जास्त वेळ लागणार नाही. त्या सवई नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? हे जाणून घेऊयात.

कुटुंब प्रमुखाचा व्यवहार –  चाणक्य म्हणतात कुटुंबातील प्रमुखाचा व्यवहार हा घरातील प्रत्येक सदस्यासोबत प्रेमळ असावा, काही प्रसंगी त्याने कठोर देखील व्हाव, मात्र घरातील सर्व सदस्यांना त्याने संभाळून घ्यावं, आपल्या भाऊ बहिणींसोबत त्याचा व्यवहार हा चांगला असावा, त्याने कधीही भाऊ बहिणींबद्दल मनात कपट ठेवू नये.

घरातील नियम – घर चांगलं चालावं, त्याचं संचलन उत्तम व्हाव यासाठी काही नियम आवश्यक असतात. मात्र घरांच्यासाठी जे नियम बनवले आहेत, त्या नियमांचं सर्वात आधी पालन कुटुंब प्रमुखानं करावं आणि नंतर घरातील इतर व्यक्तींना नियमांचं पालन करण्यास सांगावं, असं चाणक्य म्हणतात.

भांडण – चाणक्य म्हणतात जर तुमच्या घरात भांडण झालं तर सर्वात मोठी जबादारी ही कुटुंब प्रमुखाची असते त्यांने सर्वांना सांभाळून घेतलं पाहिजे तरच तुमचं घर एकसंघ राहू शकतं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.