AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या पाच ठिकाणी शांत बसणंच हिताचं, अन्यथा मृत्यूशी पडू शकते गाठ

आर्य चाणक्य हे एक त्या काळातील प्रसिद्ध कुटनीतीतज्ज्ञ होते, चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात, किंवा अशा काही जागा असतात जिथे शांत बसणं हेच तुमच्या फायद्याचं असतं, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, प्रसंगी मृत्यू देखील होऊ शकतो.

Chanakya Niti : या पाच ठिकाणी शांत बसणंच हिताचं, अन्यथा मृत्यूशी पडू शकते गाठ
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 02, 2026 | 8:46 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. माणसानं आपल्या आयुष्यात कसं वागावं, याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजच्या काळातही उपयोगी ठरतात, आयुष्यात मार्गदर्शकाची भूमिका निभावतात. चाणक्य म्हणतात अनेकदा व्यक्तीच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की त्यामुळे तो कोलमडून पडतो, काय करावं? हे त्याला काही समजत नाही. अशा स्थितीमध्ये व्यक्ती प्रचंड अस्वस्थ असतो. त्यामुळे या काळात अनेकदा तो घाईघाईने निर्णय घेतो, असे निर्णय अनेकदा चुकतात आणि त्या व्यक्तीला मोठी किंमत मोजावी लागते, त्यामुळे जेव्हाही तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतील, तेव्हा घाबरून जाऊ नका, नीट शांतपणे सर्व परिस्थितीचा विचार करा आणि त्यानंतरच आपल्यासाठी काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? हे ठरवा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या, तुम्हाला यश नक्की मिळणार, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

रागीट व्यक्ती –चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा सामना हा एखाद्या रागीट व्यक्तीशी होतो, तेव्हा अशावेळी तुम्ही शांत रहा, जर तुम्ही शांत राहाल तर समोरच्या वक्तीचा देखील राग शांत होईल, आणि पुढचे सर्व अनर्थ टळतील.

प्रतिकूल परिस्थिती – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रतिकूल काळ सुरू असतो, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये न डगमगता शांतपणे सर्व परिस्थितीचं अवलोक करा आणि नंतर निर्णय घ्या, घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे तुम्ही संकटात पडू शकता.

आजारपण – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही आजारी असता, तेव्हा जास्त श्रम करू नका, त्यामुळे तुमची तब्येत आणखी बिघडून प्रसंगी तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो, त्यामुळे आधी आजारातून बरे व्हा आणि मगच काम सुरू करा, तोपर्यंत शांत बसा.

आपल्यापेक्षा जास्त ताकद असलेला व्यक्ती – चाणक्य म्हणतात जेव्हा समोरचा व्यक्ती हा आपल्यापेक्षा जास्त ताकदवान असतो, तेव्हा अशा ठिकाणी शांत राहिलेलंच हिताचं असतं.

बलवान शत्रू – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमचा शत्रू हा बलवान असतो, तेव्हा त्याला थेट भिडणं हा मूर्खपणा असतो, त्यामुळे शांततेमध्ये सर्व नियोजन करून मगच कोणताही निर्णय घ्या.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....