AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : समस्या कितीही मोठी असू द्या, संकट काळात या गोष्टी करा, तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. संकट काळात माणसानं काय करावं आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातीलच काही गोष्टींबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : समस्या कितीही मोठी असू द्या, संकट काळात या गोष्टी करा, तुमचा पराभव कोणीच करू शकणार नाही
Chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 7:33 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चढ -उतार सुरूच असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतात. मात्र या संकटांना तुम्ही जर धैर्याने तोंड दिलं, तर ही संकट आली तशीच निघून जातात. मात्र संकटांमुळे तुम्ही जर खचलात, हिंमत हारलात तर मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकरणार नाहीत. त्यामुळे संकटांना कधीही घाबरून जाऊ नका. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही या जगात कोणतीही गोष्ट सहज मिळू शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात जर समजा तुमचा पराभव झाला असेल, एखादी गोष्ट तुम्हाला मिळवता आली नसेल, तर लगेच खचून जाऊ नका, त्या गोष्टीचं आत्मपरीक्षण करा आपण नेमकं कुठे कमी पडलो ते लक्षात ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे?

शत्रूला कधीही कमी लेखू नका – चाणक्य म्हणतात तुमच्या यशामधील सर्वात मोठा अडथळा जर कोणता असेल तर तो म्हणजे तुमचा शत्रू. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळवायचं असेल तर तुमचा शत्रू कसाही असू द्या, छोटा-मोठा त्याला कमी लेखण्याची चूक करू नका. त्याच्यापासून नेहमी सावंध राहा. तो तुमचा पराभव करण्यासाठी प्रयत्न करणार पण तुम्ही त्याच्या एक पाऊल पुढे राहा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

धैर्य आणि संयम – चाणक्य म्हणता संकट येतात, तशी ती जातात देखील. मात्र तुम्हाला तुमच्यावर आलेल्या संकटावेळी संयम ठेवता आला पाहिजे. जर तुम्ही या काळात आपला संयम गमावला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. मात्र जर तुम्ही तुमच्या संकट काळात संयम ठेवून येणाऱ्या संकटाचा धैर्याने सामना केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणीही पराभूत करू शकत नाही.

योजना गुप्त ठेवा – चाणक्य म्हणतात तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या काही योजना बनवतात त्या योजना गुप्त ठेवा, आपल्या भविष्यातील योजनांबद्दल कोणालाही माहिती देऊ नका, तर आणि तरच तुम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ शकता.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत
Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा मोठा दावा
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!