Chanakya Niti : अशी संतती आपल्या कुटुंबाचा सर्वनाश करते, चाणक्य यांनी सांगितले वाईट मुलांची लक्षणं
आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये आदर्श मुलं कसे असावेत? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात की जर एखादं मुलं चुकीच्या मार्गाने गेलं, त्याच्यावर योग्य संस्कार झाले नाहीत, तर तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाचं सार सांगितलं आहे. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना आपल्या आयुष्यात प्रेरणा देतात. मानसाची कर्तव्य काय असतात? आदर्श पती कोणाला म्हणावं? आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत? कुटुंब कसं असावं? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यासोबतच चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये आदर्श संतती कशी असावी? आणि संतती चुकीच्या मार्गाने गेली तर कुटुंबाचा नाश कसा होतो, हे देखील सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी आदर्श संततीची नेमकी काय लक्षणं सांगितली आहेत, आणि जर एखादं मुल चुकीच्या मार्गावर गेलं तर तो आपल्या कुटुंबाचा कसा नाश करू शकतो? याबद्दल माहिती.
आदर्श संततीची लक्षणं – चाणक्य म्हणतात मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार होणं गरजेचं असतं. जर मुलांवर योग्य संस्कार झाले नाहीत. मुलं चुकीच्या संगतीला लागले तर ते फक्त एकट्या त्या संबंधित कुटुंबाचाच नाश करत नाहीत, तर संपूर्ण देशाचं देखील वाटोळ करत असतात. कारण तरुण हा कोणत्याही देशासाठी मोठी साधन संपत्ती असते. तरुणांच्या घामाच्या बळावरच कुठल्याही देशाचा विकास होत असतो. त्यामुळे मुलांवर लहानपणापासूनच श्रमप्रतिष्ठेचे संस्कार झाले पाहिजेत. तसेच आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळून देणं हे कोणत्याही आई-वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे. मुलगा जर सुशिक्षित असेल, तो आपल्या कुटुंबांचा व्यवस्थित सांभाळ करत असेल, आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेबाहेर नसेल तर अशा मुलांना आदर्श संतती म्हणावं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य पुढे आपल्या चाणक्य नीति नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की जसं एखाद्या वाळलेल्या झाडाला जंगलात आग लागते, आणि त्यानंतर त्या आगीचं रूपांतर वणव्यात होऊन संपूर्ण जंगल जळून खाक होतं. तसंच मुलांच्या बाबतीमध्ये देखील होतं. जर तुमचं मुल वाईट मार्गाला लागलं. व्यसन करत असेल, जुगार खेळत असेल, मोठ्यांच्या आदर करत नसेल तर अशी संतती स्वत:सोबतच आपल्या कुटुंबांचा देखील नाश करते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
