AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे असावेत? चाणक्य यांचा मौलिक सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, माणसानं काय करावं आणि काय करू नये? याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. एखाद्या कुटुंबांचे त्यांच्या शेजारी असलेल्या कुटुंबासोबत कसे संबंध असावेत? याबाबत देखील चाणक्य यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

Chanakya Niti : शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे असावेत? चाणक्य यांचा मौलिक सल्ला
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 7:52 PM
Share

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात, त्यातलंच एक नात असतं ते शेजाऱ्याचं. आपण जेव्हा संकटात असतो, तेव्हा आपले नातेवाईक आपल्याला मदत करतील की नाही? याचा कोणताही भरोसा नसतो. मात्र कोणतंही नातं नसताना आपले शेजारी आपल्या मदतीला धावून येतात. अगदी मध्यरात्री जरी आपल्याला कशाची गरज असेल तर शेजारीच आपल्या कामाला येऊ शकतात. त्यामुळे अशा शेजाऱ्यांना कधीही दुखावलं नाही पाहिजे. मात्र त्याचसोबत काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात शेजाऱ्यांसोबत आपला व्यवहार कसा असावा? आणि चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.

शत्रू मित्र सिद्धांत – चाणक्य म्हणतात माणसानं शेजाऱ्यांना कधी शत्रू मानलं नाही पाहिजे, तसेच कधीही पूर्ण मित्र देखील मानलं नाही पाहिजे. कारण या जगात जसे चांगले लोक आहेत, तसे वाईट लोक देखील असू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा अनेक शेजारी असे असतात की ते संकट काळात अगदी मध्यरात्री देखील तुमच्या मदतीला धावून येतात. तुमचे नातेवाईक साथ सोडतील पण शेजारी साथ सोडत नाही. आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं आपण जपली पाहिजे. परंतु असे देखील काही शेजारी असात ज्यांना तुमची सुरू असलेली प्रगती पहावत नाही. ते सारखा तुमचा द्वेष करतात. जर उघड -उघड शत्रूत्व घेण्याची त्यांची ताकद नसेल तर ते पडद्यामागून तुमच्याविरोधात कट कारस्थान करतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. कोणासोबत मैत्री ठेवायची आणि कोणापासून चार हात लांब राहायचं हे जर तुम्हाला कळालं, तर तुमची प्रगती कोणीही थांबू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

साम, दाम दंड भेद – चाणक्य यांनी शेजारच्या व्यक्तीशी संबंध कसे असावेत हे सांगताना साम, दाम, दंड, भेद या चार नीती सांगितल्या आहेत. साम म्हणजे शेजाऱ्यांच्या कायम संपर्कात रहा, एखादी समस्या असेल तर ती चर्चेने सोडवा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. दाम म्हणजे चाणक्य म्हणतात तुमचा जो शेजारी आहे, त्याला कधीही काही मदत लागली तर तुम्ही त्यासाठी नेहमी तयार रहा, कारण त्यामुळे तोही संकट काळात तुम्हाला मदत करेल. दंड म्हणजे चाणक्य म्हणतात जर तुमचा शेजारी हा सतत तुमचा द्वेष करत असेल तर त्यावेळी तुम्हाला त्याच्यापासून सावध रहावं लागेल, वेळ पडली तर त्याला धडा शिकवावा लागेल. भेद म्हणजे चाणक्य म्हणतात की आपल्या विरोधात काही कट कारस्थान रचलं जात आहे का? याची माहिती आपल्याला असायलाच हवी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.