AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या चार चुका आयुष्य बरबाद करतील, दुर्लक्ष नकोच, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात माणूस आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो की त्याच्यावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते.

Chanakya Niti : या चार चुका आयुष्य बरबाद करतील, दुर्लक्ष नकोच, चाणक्य काय म्हणतात?
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 20, 2026 | 9:02 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. माणसानं आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यता सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो की, त्या चुकांना आयुष्यभर माफी मिळू शकत नाही, ती एकच संधी त्याच्याकडे असते, मात्र त्यावेळी त्याने योग्य निर्णय न घेतल्यास त्याच्यावर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येते. माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. फक्त त्याचंच नाही तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या इतर व्यक्तींना देखील कष्ट भोगावे लागतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, आणि या चुका नेमक्या काय आहेत? त्याबद्दल.

आजचं काम उद्यावर ढकलणं – चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की आजचं काम आजच करा, आजची काम कधीही उद्यावर ढकलू नका. जर तुम्ही आजचं काम उद्यावर ढकलत असाल तर आयुष्यात तुम्ही फार मोठी चूक करत आहात, तुम्हाला त्यामुळे तुमच्या कामात कधीही यश मिळणार नाही. तसेच तुम्ही कायम जगाच्या मागे राहाल. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर आजचं काम आजच करा ते काम उद्यावर ढकलण्याची चूक कधीही करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. कामं नेहमी वेळेतच पूर्ण झाली पाहाजिते असं चाणक्य म्हणतात.

शिक्षणाकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात शिक्षणाकडे दुर्लक्ष करणं ही एक अक्षम्य चूक आहे. जे लोक शिकण्याच्या वयात शिकत नाहीत, अशा लोकांच्या वाट्याला आयुष्यभर पश्चातापच येतो. अशा लोकांना भविष्यात चांगले रोजगाराचे साधन मिळत नाही, परिणामी त्यांची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. असे लोक कायम जगाच्या पाठीमागेच राहतात, त्यामुळे कधीही शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

नातेसंबंध आणि मित्रांकडे दुर्लक्ष – चाणक्य म्हणतात तुमचे मित्र हेच तुमचे खरे सोबती असतात, ते तुमच्यावर संकट आलं की प्रत्येकवेळी तुमच्या मदतीला धावून येतात. तुमच्यावरचं संकट दूर करतात. तसेच नातेवाईक देखील संकट काळात तुमची मदत करतात. त्यामुळे त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. मित्र आणि नातेवाईंकाच्या कायम संर्पकात राहा, त्यातच तुमचं हीत आहे.

कष्ट – चाणक्य म्हणतात या जगात कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही, त्यामुळे कधीही कष्ट टाळण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही आयुष्यात जेवढे जास्त कष्ट कराल तेवढी जास्त प्रगती कराल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान