AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या तीन सवयी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजनितीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. ते त्यांच्या काळातील एक कुशल मार्गदर्शक होते. त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक त्यांच्याकडे येत असत

Chanakya Niti : या तीन सवयी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, चाणक्य काय सांगतात?
Image Credit source: TV9 Network/File
| Updated on: Sep 06, 2025 | 5:35 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ, राजनितीतज्ज्ञ आणि विचारवंत होते. ते त्यांच्या काळातील एक कुशल मार्गदर्शक होते. त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी देशभरातून लोक त्यांच्याकडे येत होते. आजच्या युगात देखील आर्य चाणक्य यांचे विचार हे व्यक्तीला आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतात. आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना प्रेरणा देतात.आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या सवयी जर व्यक्तीला असतील तर असा व्यक्ती कंगाल होतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्या सवयी नेमक्या कोणत्या आहेत? आणि आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

भविष्यासाठी धनाचा संचय न करणं – आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे की, व्यक्तीला नेहमी आपल्या कमाईचा काही भाग, आपल्या भविष्यासाठी वाचवला पाहिजे. ज्या लोकांना पैशांची बचत करण्याची सवय नसते, त्यांचं भविष्यात मोठं नुकसान होतं. एक गोष्ट लक्षात ठेवा , तुमच्या संकट काळात फक्त तुम्ही बचत केलेला पैसाच तुमच्या उपयोगी पडणार आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना पैशांची बचत करण्याची सवय नसते अशा लोकांचं मोठं नुकसान होतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कारण नसताना पैसे खर्च करणे – आर्य चाणक्य म्हणतात कारण नसताना पैसे खर्च करू नये, जिथे पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे, तिथे पैसे खर्च करावेत, मात्र तुम्ही जर पैशांची उधळपट्टी केली तर भविष्यात त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते. जर तुम्ही गरज नसताना पैसा खर्च केला तर त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागू शकते.

दुसऱ्याची उधारी – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे पैसे नसतील तर इतरांकडून पैसे उधार घेऊन घरात एखादा उत्सव साजरा करू नका,असे केल्यास तुम्ही कर्जबाजारी व्हाल, तुम्ही संकटात सापडाल. माणसानं नेहमी अंथरून पाहूनच पाय पसरावेत असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....