AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : हा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुर्गुण, चाणक्य म्हणतात आयुष्याचं वाटोळं होतं

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाचं समाजात वावरताना वर्तन कसं असावं? याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात, जो व्यक्ती आपल्यामधील दुर्गुण ओळखून वेळीच त्यांचा त्याग करतो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो.

Chanakya Niti : हा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुर्गुण, चाणक्य म्हणतात आयुष्याचं वाटोळं होतं
chanakya nitiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 09, 2026 | 7:54 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच समाजात वावरताना माणसाचं वर्तन कसं असलं पाहिजे, याबद्दल देखील मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्यामधील दुर्गुण शोधता आले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही त्या दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. चाणक्य पुढे असंही म्हणतात की माणसाचं हे दुर्दैव आहे की त्याला आपल्यामधील दुर्गुण कधीच दिसत नाहीत, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर आरोप करतो तेव्हा एक बोट त्याच्याकडे असतं, मात्र चार बोटं ही आपल्याकडे असतात. त्यामुळे कोणालाही दोष देण्यापूर्वी माणसानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपल्यामधील उणीवा शोधून त्या दूर केल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सर्वात मोठा दुर्गुण कोणता? चाणक्य म्हणतात माणसाचा सर्वात मोठा दुर्गुण कोणता असेल तर तो म्हणजे मला सगळं माहिती आहे, मला कोणाची गरज नाही हा त्याच्या मनात निर्माण झालेला गैरसमज आहे. हा गैरसमज वेळीच दूर होणं गरजेच असतं. मला सगळं माहीत आहे, असा जेव्हा माणसाचा समज होतो, तेव्हा त्याच्या अंधपतनाला सुरुवात होते. त्याच्या प्रगतीला ब्रेक लागतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की त्याला सगळं माहीत आहे, तेव्हा असा व्यक्ती कधीच नवं ज्ञान आत्मसात करू शकत नाही. पुरेस ज्ञान नसल्यामुळे असा व्यक्ती जगाच्या स्पर्धेत मागे पडतो आणि कालंतराने बाद होतो. त्यामुळे मानसाने मला सगळं काही माहीत आहे, मी सर्वज्ञानी आहे, असा गैरसमज करून घेऊ नये असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. माणसाने नेहमी शिकण्याची भूमिका ठेवली पाहिजे, नेहमी नवीन ज्ञान आत्मसात केलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

खोट बोलणं – चाणक्य म्हणतात हा देखील माणसाचा मोठा दुर्गुण आहे. परिस्थिती कशीही असो, माणसाने नेहमी सत्यच बोललं पाहिजे. तुम्ही नेहमीच खोटं बोलत आहात, हे जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येत तेव्हा अशा परिस्थितीमध्ये लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होण्यास सुरुवात होते, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड