Char dham yatra 2023 : या तारखेला उघडणार बद्रिनाथ मंदिराचे द्वार, भक्तांना मिळणार या सुविधा

मान्यतेनुसार चार धाम यात्रेची सुरुवात माता यमुनेच्या दर्शनाने होते. दुसरा मुक्काम गंगोत्री, तिसरा केदारनाथ आणि चौथा बद्रीनाथ असेल. जर तुम्हाला चारही धामांना भेट द्यायची असेल तर तुम्हाला किमान..

Char dham yatra 2023 : या तारखेला उघडणार बद्रिनाथ मंदिराचे द्वार, भक्तांना मिळणार या सुविधा
बद्रीनाथ धाम
Image Credit source: Social Media
| Updated on: Apr 15, 2023 | 4:03 PM

मुंबई : हिंदू धर्मात चारधाम यात्रेला (Char dham yatra 2023) विशेष महत्त्व आहे. धर्मग्रंथात चारधाम यात्रा अतिशय शुभ मानली गेली आहे. या वर्षी 2023 मध्ये 22 एप्रिलपासून म्हणजेच अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे, अक्षय्य तृतीयेची तिथी अत्यंत शुभ मानली जाते. हिंदू मान्यतेनुसार या दिवसापासून त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते. चार धाम गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम, यांना मोठ्या संखेने भाविक भेट देतात.  एकेकाळी आदि शंकराचार्यांनी या पवित्र स्थानांवर पूजा केली होती. उत्तराखंड राज्याच्या चारधाम यात्रेत, भक्त पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे यमुनोत्रीपासून गंगोत्री, केदारनाथपर्यंत चालत जातात आणि शेवटी त्यांची यात्रा पूर्ण करण्यासाठी बद्रीनाथला पोहोचतात. चार धाम यात्रेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

या दिवसापासून उघडतील केदारनाथचे दरवाजे

देवांचे देव महादेवाचे 11 वे ज्योतिर्लिंग असलेल्या केदारनाथचे दरवाजे 25 एप्रिल रोजी पहाटे मेष लग्नात उघडतील, केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याचा पूजेचा कार्यक्रम 21 एप्रिल 2023 पासून सुरू होईल आणि 22 एप्रिलपासून सूरू होईल. उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरापासून एक दिवस आधी केदारनाथला पोहोचेल. त्यामुळे केदारनाथचे दरवाजे उघडताच महादेवाच्या भक्तांची गर्दी होणार आहे.

या दिवशी बद्रीनाथचे दरवाजे उघडतील

बद्रीनाथ मंदिर हे श्री हरींच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. 27 एप्रिलला ब्रह्म मुहूर्तावर बद्रीनाथचे दरवाजे उघडले जातील. ज्याद्वारे सर्वसामान्य यात्रेकरू भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेऊ शकतील.

किमान 10 दिवसांची असेल यात्रा

मान्यतेनुसार चार धाम यात्रेची सुरुवात माता यमुनेच्या दर्शनाने होते. दुसरा मुक्काम गंगोत्री, तिसरा केदारनाथ आणि चौथा बद्रीनाथ असेल. जर तुम्हाला चारही धामांना भेट द्यायची असेल तर तुम्हाला किमान 10 दिवसांचा अवधी द्यावा लागेल. तथापि, जर तुम्हाला वाटेत वेगवेगळ्या सुंदर थांब्यांचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला तुमच्यासोबत थोडा वेळ काढावा लागेल.

यात्रेला निघण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

घरातून बाहेर पडण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी सोबत ठेवा. चारधाम यात्रेच्या मार्गावर हवामान बदलत आहे. म्हणूनच उबदार कपडे, पुरेसे पिण्याचे पाणी, औषधे आणि रेन कोट सोबत ठेवा. तुम्ही अजून हॉटेलमध्ये रूम बुक केल्या नसतील तर बुकिंग करून घ्या. यामुळे तुम्हाला प्रवासादरम्यान राहण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)