AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुजा करताना दिवा विझल्याने खरच अपशकुन होतो का? असा होतो याचा अर्थ

पूजेच्या वेळी दिवा विझणे हे सामान्यतः अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी दिवा विझला तर देवी-देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते. पूजा पूर्ण झाली नाही आणि त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही असाही समज आहे.

पुजा करताना दिवा विझल्याने खरच अपशकुन होतो का? असा होतो याचा अर्थ
दिवा विझणे अपशकून असतो का?Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 05, 2023 | 9:25 AM
Share

मुंबई : सनातन धर्मात दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे वातावरणात सकारात्मकता येते. जीवनातील अंधार दूर करून प्रकाश आणण्याचेही ते प्रतीक आहे. याशिवाय पूजेतील दिवा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले जातात. शिवाय त्यांची संख्याही वेगवेळी सांगण्यात आलेली आहे. पूजा आणि प्रत्येक खास प्रसंगी लावल्या जाणाऱ्या दिव्यांशी संबंधित (Diya In Puja) अनेक मान्यता आहेत. उदाहरणार्थ, दिवा लावणे शुभ आहे परंतु पूजेच्या वेळी दिवा विझणे अशुभ मानले जाते. पूजेचा दिवा विझणे हे खरोखरच अशुभ लक्षण आहे का ते जाणून घेऊया.

दिवा विझण्यामागे हे आहे कारण

पूजेच्या वेळी दिवा विझणे हे सामान्यतः अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी दिवा विझला तर देवी-देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते. पूजा पूर्ण झाली नाही आणि त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही असाही समज आहे. पूजेच्या वेळी दिवा विझला तर मनोकामना पूर्ण होण्यात अडथळा येतो, अशीही एक धारणा आहे. दुसर्‍या मान्यतेनुसार, दिवा विझवणे ही व्यक्ती खऱ्या मनाने देवाची पूजा करत नसल्याचे लक्षण आहे.

तथापि, दिवा विझण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी वाऱ्यामुळे किंवा दिव्याच्या वातीच्या काही समस्येमुळे दिवा विझू शकतो. असे झाले तर हात जोडून देवाकडे क्षमा मागून पुन्हा दिवा लावा. अशी घटना घडू नये म्हणून दिवा लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे योग्य ठरेल. यासाठी दिव्यात तेल किंवा तूप पुरेशा प्रमाणात ठेवावे. चांगला दिवा वापरावा. आरती किंवा पूजा करताना काही वेळ पंखा बंद ठेवा. किंवा वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी दिव्यावर काच ठेवावा, जेणेकरून दिवा तेवत राहील.

अखंड ज्योत विझल्यास काय होते

कोणत्याही संकल्पाच्या पूर्ततेसाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर त्याची पूर्ण काळजी घ्यावी कारण अखंड ज्योती विझवल्याने मनोकामना पूर्ण होण्याबाबत शंका येऊ शकते. असे मानले जाते की अशी घटना कुटुंबावर संकट आणू शकते. त्यामुळे अखंड ज्योती पेटवताना त्याभोवती काचेचे आच्छादन ठेवावे व त्यात भरपूर तेल व तूप ठेवावे. तसेच अखंड ज्योतीच्या शेजारी छोटा दिवा लावावा. जेणेकरून त्यातून पुन्हा अखंड ज्योत प्रज्वलित होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार
पुणे पुन्हा हादरलं! त्या बॅनरवरून वाद; दोन गटांमध्ये गोळीबार.
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका
हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं पीक मातीमोल, शेतकऱ्यांना लाखोंचा फटका.
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान
सांगलीत अवकाळीचा हाहाकार, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी.
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?
भोंदूबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर गोत्यात; तटकरे यांची प्रतिक्रिया काय?.
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या
तर मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटलांचीही चौकशी करा, अंधारे कडाडल्या.
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?
एकनाथ शिंदे यांचे सीडीआर तपासण्याची हिंमत गृहखातं दाखवेल का?.
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या
तर माझे यजमानच...चाकणकर यांच्या त्या विधानाचा दाखला देत अंधारे बरसल्या.
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल
राज्यातील 9 मंत्री लिंगपिसाट बाबाचे अनुयायी, ही तर खरात फाईल.
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर
उद्योग ठप्प, कामगारांचे मुंबईतून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर.