AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुजा करताना दिवा विझल्याने खरच अपशकुन होतो का? असा होतो याचा अर्थ

पूजेच्या वेळी दिवा विझणे हे सामान्यतः अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी दिवा विझला तर देवी-देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते. पूजा पूर्ण झाली नाही आणि त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही असाही समज आहे.

पुजा करताना दिवा विझल्याने खरच अपशकुन होतो का? असा होतो याचा अर्थ
दिवा विझणे अपशकून असतो का?Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 05, 2023 | 9:25 AM
Share

मुंबई : सनातन धर्मात दिवा लावणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे वातावरणात सकारात्मकता येते. जीवनातील अंधार दूर करून प्रकाश आणण्याचेही ते प्रतीक आहे. याशिवाय पूजेतील दिवा अग्नि तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावले जातात. शिवाय त्यांची संख्याही वेगवेळी सांगण्यात आलेली आहे. पूजा आणि प्रत्येक खास प्रसंगी लावल्या जाणाऱ्या दिव्यांशी संबंधित (Diya In Puja) अनेक मान्यता आहेत. उदाहरणार्थ, दिवा लावणे शुभ आहे परंतु पूजेच्या वेळी दिवा विझणे अशुभ मानले जाते. पूजेचा दिवा विझणे हे खरोखरच अशुभ लक्षण आहे का ते जाणून घेऊया.

दिवा विझण्यामागे हे आहे कारण

पूजेच्या वेळी दिवा विझणे हे सामान्यतः अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी दिवा विझला तर देवी-देवतांच्या नाराजीचे लक्षण मानले जाते. पूजा पूर्ण झाली नाही आणि त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही असाही समज आहे. पूजेच्या वेळी दिवा विझला तर मनोकामना पूर्ण होण्यात अडथळा येतो, अशीही एक धारणा आहे. दुसर्‍या मान्यतेनुसार, दिवा विझवणे ही व्यक्ती खऱ्या मनाने देवाची पूजा करत नसल्याचे लक्षण आहे.

तथापि, दिवा विझण्याची अनेक कारणे असू शकतात. कधी कधी वाऱ्यामुळे किंवा दिव्याच्या वातीच्या काही समस्येमुळे दिवा विझू शकतो. असे झाले तर हात जोडून देवाकडे क्षमा मागून पुन्हा दिवा लावा. अशी घटना घडू नये म्हणून दिवा लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे योग्य ठरेल. यासाठी दिव्यात तेल किंवा तूप पुरेशा प्रमाणात ठेवावे. चांगला दिवा वापरावा. आरती किंवा पूजा करताना काही वेळ पंखा बंद ठेवा. किंवा वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी दिव्यावर काच ठेवावा, जेणेकरून दिवा तेवत राहील.

अखंड ज्योत विझल्यास काय होते

कोणत्याही संकल्पाच्या पूर्ततेसाठी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर त्याची पूर्ण काळजी घ्यावी कारण अखंड ज्योती विझवल्याने मनोकामना पूर्ण होण्याबाबत शंका येऊ शकते. असे मानले जाते की अशी घटना कुटुंबावर संकट आणू शकते. त्यामुळे अखंड ज्योती पेटवताना त्याभोवती काचेचे आच्छादन ठेवावे व त्यात भरपूर तेल व तूप ठेवावे. तसेच अखंड ज्योतीच्या शेजारी छोटा दिवा लावावा. जेणेकरून त्यातून पुन्हा अखंड ज्योत प्रज्वलित होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक...
8 ते 10 दिवस थांबा, सर्व बाहेर येईल, सतीश सालियांन यांच्या सुचक विधानाचा अर्थ काय?
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?