AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने ‘या’ गोष्टी पाळल्याच पाहिजेत

वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच घरातील वास्तूदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्राचे काही सोपे नियम पाळून घराला शुद्ध आणि आनंदी ठेवू शकता.

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीने 'या' गोष्टी पाळल्याच पाहिजेत
every person must keep these things in mind to maintain positive energy vastushatrsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 7:06 PM
Share

वास्तुशास्त्र म्हटलं की घरातील प्रत्येकच गोष्टीबद्दल, दिशांपासून ते दैनंदिन दिनचर्या अशा बऱ्याच गोष्टींबद्दल सांगितलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अनेक बाबींवर घरातील वातावरण, ऊर्जा, आरोग्य आणि यश, नातेसंबंध अवलंबून असते. नक्कीच चुकीच्या गोष्टीचा या सर्वांवर थेट परिणाम करतात. कधीकधी, अगदी लहानसा निष्काळजीपणा देखील घराची सकारात्मकता कमी करू शकतो आणि समस्या वाढवू शकते. तथापि, काही सोप्या नियमांचे पालन केल्याने घरात आनंद, शांती आणि प्रगती टिकून राहू शकते. प्रकाश, शांत आणि सकारात्मक वातावरण राखण्यासाठी प्रत्येकाने काही वास्तु तत्वे लक्षात ठेवली पाहिजेत. वास्तुशास्त्रानुसार लक्षात ठेवल्या पाहिजेत अशा महत्त्वाच्या मुद्द्यांना जाणून घेऊयात ज्यामुळे वास्तूदोष निर्माण होणार नाही. तसेच घरातील वातावरण शुद्ध राहिलं.

मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा

सर्वप्रथम, मुख्य दरवाजा नेहमीच स्वच्छ असावा. घरात उर्जेचा प्रवेश करण्यासाठी हा पहिला मार्ग मानला जातो. मुख्य दरवाजावरील तुटलेली नेमप्लेट, ग्रिल किंवा घाण घराची सकारात्मकता कमकुवत करते. दाराजवळ पेटलेला दिवा किंवा वनस्पती ठेवल्याने शांती आणि शुभता वाढते. तुटलेल्या वस्तू, फाटलेले कपडे, खराब झालेले इलेक्ट्रॉनिक्स किंवा निरुपयोगी वस्तू घरात कधीही ठेवू नका. अशा वस्तू अडथळे, तणाव निर्माण करतात.

बेडरूम स्वच्छ ठेवा

बेडरूम शांत, हलक्या रंगाची आणि स्वच्छ असावी. बेडरुममध्ये आरसा ठेवू नका, कारण यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो आणि अस्वस्थता येऊ शकते.

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा

दररोज सकाळी स्वयंपाकघरातील गॅस नेहमी स्वच्छ असावा, ओटा देखील नेहमी स्वच्छ असावा. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक केल्याने थकवा वाढतो, स्वयंपाक करताना शक्य असल्यास तोंड हे नेहमी, पूर्वेकडे , उत्तरेकडे किंवा पश्चिमेकडे असावे.

प्रार्थनास्थळ स्वच्छ ठेवा

प्रार्थनास्थळ प्रकाशमान, शांत आणि स्वच्छ असावे. तेथे कधीही बूट, चप्पल, जड वस्तू किंवा गोंधळ ठेवू नका. दररोज दिवा लावल्याने घरात शांती आणि मानसिक स्थिरता येते.

खिडक्या उघड्या ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, घरात ताजी हवा आणि प्रकाश येणे फार आवश्यक आहे. सकाळी काही मिनिटांसाठी खिडक्या उघड्या ठेवा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल. तुळस, घरात शांती आणि सकारात्मकता वाढवते त्यासाठी तिची पूजा नेहमी करत राहा.

घराच्या प्रत्येक कोपऱ्यात स्वच्छता ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा. घाण आणि धूळ मनावर जडपणा आणते आणि वास्तुनुसार, अडथळे वाढवते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही) 

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.