AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी होण्याची चार सूत्र, जीवनात प्रगती करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली थेट ग्रहांशी संबंधित असते. जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर त्याला जीवनात यश मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक लाभ मिळू शकत नाही. म्हणून, आळस सोडल्यास ते चांगले होईल. आळस हा मानसाचा शत्रू आहे हे आपण लहानपणापासूनचं एकत आलेलो आहे. आळशी व्यक्ती हातातून वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतो. 

यशस्वी होण्याची चार सूत्र, जीवनात प्रगती करण्यासाठी हे घटक महत्त्वाचे
यशस्वी होण्याची सुत्रे Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 23, 2023 | 9:38 AM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्तीला जीवनात श्रीमंत होण्याची तसेच यशस्वी (Success Story) होण्याची इच्छा असते जेणेकरून त्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही आणि अडीअडचणीच्या वेळी इतरांसमोर त्याला हात पसरविण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे पैसा मिळवण्यासाठी माणूस खूप मेहनत करतो. अशा स्थितीत शास्त्रांमध्ये अनेक सवयींचे वर्णन केले आहे, ज्याचा अवलंब केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतात, ज्यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो. चला जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीच्या अशा सवयी ज्यामुळे तो श्रीमंत होतो.

श्रीमंत व्यक्ती स्वच्छतेला महत्त्व देतो

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, धनाची देवी लक्ष्मी अशा ठिकाणी वास करते, जिथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते. अशा परिस्थितीत, आपण आपले घर नियमितपणे स्वच्छ केले पाहिजे. यासोबतच लक्षात ठेवा की, स्वयंपाकघरात खोटी खरकटी कधीही ठेवू नयेत. असे केल्याने माता अन्नपूर्णा नाराज होते.

गरजूंना मदत करा

सनातन धर्मानुसार असे मानले जाते की जे लोक गरजूंना वस्तू दान करतात त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाशी संबंधित समस्या येत नाहीत. यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या हयातीत आपल्या क्षमतेनुसार गरजूंना मदत करत राहावे. यामुळे देवी-देवता तुमच्यावर खूप प्रसन्न राहतात.

मोठ्यांचा आदर करा

ज्या घरामध्ये वडिलधाऱ्यांचा आणि स्त्रियांचा आदर केला जातो, त्या घरामध्ये धनाची देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न असते त्यामुळे ती तुमच्यावर कृपा ठेवते. यासोबतच गायींची सेवा करणाऱ्यांवर माता लक्ष्मीही खूप प्रसन्न असते. अशा वेळी घरी अन्न शिजवताना गाईसाठी पहिली रोटी काढावी. यातून तुम्हाला शुभ लाभ मिळतात.

ज्योतिषशास्त्र काय सांगते

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली थेट ग्रहांशी संबंधित असते. जर एखादी व्यक्ती आळशी असेल तर त्याला जीवनात यश मिळत नाही ज्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक लाभ मिळू शकत नाही. म्हणून, आळस सोडल्यास ते चांगले होईल. आळस हा मानसाचा शत्रू आहे हे आपण लहानपणापासूनचं एकत आलेलो आहे. आळशी व्यक्ती हातातून वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.