AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

याच जन्मात निश्चीत होते कसा असणार तुमचा पुढचा जन्म? असा काम करतो कर्माचा नियम

गरूड पूराणात (Garud Puran) सांगितले आहे की, माणसाचे या जन्मातील कर्म पाहून त्याला पुढील जन्म कोणता जन्म मिळेल याचा अंदाज लावता येतो. शास्त्रात याची अनेक उदाहरणे आहेत.

याच जन्मात निश्चीत होते कसा असणार तुमचा पुढचा जन्म? असा काम करतो कर्माचा नियम
पुनर्जन्मImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 12, 2023 | 11:06 AM
Share

मुंबई : हिंदू धर्म हा पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो. आपल्या सर्वांना या जन्मात मनुष्य जन्म मिळाला आहे, परंतु पुढील जन्मही आपण मनुष्याचाच घेऊ हे आवश्यक नाही. खरे तर पुढचा जन्म आपल्याला कसा मिळणार हे सर्वस्वी या जन्माच्या कर्मावर अवलंबून आहे. गरूड पूराणात (Garud Puran) सांगितले आहे की, माणसाचे या जन्मातील कर्म पाहून त्याला पुढील जन्म कोणता जन्म मिळेल याचा अंदाज लावता येतो. शास्त्रात याची अनेक उदाहरणे आहेत. ज्यांना या जन्मी मानवरूप प्राप्त झाले आहे, त्यांना हे सौभाग्य अनंत जन्मांच्या संस्कारानुसार प्राप्त झाले आहे. खालच्या स्तरावरील प्रजातींचे कर्म खाते देखील असे आहेत. आपल्या चैतन्याचा पुढचा प्रवास असा आहे की ज्यांचे सात्विक गुण आहेत ते उच्च कुळाकडे जातात आणि रजोगुण असणारे निच्चतेकडे जातात. ज्यांच्यावर तमोगुणाचे वर्चस्व असते ते निम्न स्तराच्या प्रजातींमध्ये जीवन प्रवास करतात.

कर्मावरून ठरतो असा असणार जन्म

दानशूर, सदाचारी, इतरांना मदत करणारी, समाजसेवी, सुसंस्कृत आणि दयाळू पुढच्या जन्मी उच्च कुळात जन्म घेते.

ज्या व्यक्तीला पैशाचा लोभ नसेल, त्याच्याकडे उदार वृत्ती असेल आणि चांगल्या कामात पैसा लावला तर त्याला पुढील जन्मात उत्स्फूर्तपणे पैसा मिळतो. त्यानंतर तो तो पैसा चांगल्या कामात गुंतवतो.

जर एखादी व्यक्ती हुशार असेल, ज्ञान दान करत असेल, तर त्याचे अंतरंग चेतना अशी होते की तो पुढील जन्मात कोणताही विषय लवकर शिकतो. यामुळे त्याला प्रखर बुद्धिमत्ता किंवा उच्च पातळीची बुद्धिमत्ता प्राप्त होते.

एखादी व्यक्ती शिकलेली असूनही आपले ज्ञान इतरांना देत नसेल आणि ते स्वतःपुरतेच मर्यादित ठेवत असेल, तर अशी व्यक्ती पुढील जन्मात मानसिक आजारी पडते. त्याच्या जमा झालेल्या ज्ञानाचा खजिना पुढे सरकता येत नाही.

जर एखादी व्यक्ती खूप भांडखोर असेल, बदलाची भावना असेल तर असे मानले जाते की ती पुढील जन्मात सापाच्या योनीत जातो.

जर ती व्यक्ती पैशाशी खूप संलग्न असेल आणि पैसे खर्च करत नसेल. या आसक्तीमुळे ती त्या संपत्तीपासून वेगळी राहू शकत नाही, म्हणून ती सापासारख्या त्याभोवती घिरट्या घालत राहते, असे म्हणतात.

जर एखादा मनुष्य इंद्रियसुखांमध्ये जास्त मग्न असेल तर तो पुढील जन्मी कामाच्या अतिरेकामुळे मागे पडतो आणि त्याच्या सर्व शक्तीचा योग्य वापर करू शकत नाही.

शेवटच्या वेळेचे चिंतन निर्णायक आहे

माणसाला शेवटी जे विचार येतात त्यानुसार पुढचे आयुष्य मिळते. शेवटच्या काळाचे चिंतन व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. त्याचे विचार तो जे संस्कार करत आला आहे, त्याने आयुष्यभर काय केले आहे आणि त्याचा त्याच्या मनावर काय परिणाम झाला आहे आणि पुढचा जन्म त्या विचारांनुसार असेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.