Garuda Purana | हमखास यशस्वी होण्याचे पाच मार्ग; ‘या’ गोष्टी केल्यात तर कधीच अपयश येणार नाही

| Updated on: Jun 07, 2021 | 8:49 AM

गरुड पुराण (Garuda Purana) व्यक्तीचे जीवन-मृत्यू आणि मृत्यूनंतरचे रहस्ये उघडकीस आणणारे म्हणून ओळखले जाते. सनातन धर्मात याला महापुराण असे नाव देण्यात आले आहे.

Garuda Purana | हमखास यशस्वी होण्याचे पाच मार्ग; या गोष्टी केल्यात तर कधीच अपयश येणार नाही
अन्न ही तुमच्या शरीराची गरज आहे आणि ते गरजेनुसार घेतले पाहिजे. त्याच्याशी संलग्न असणे, चवीसाठी तामसिक भोजन खाणे आणि आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्याची सवय आपल्यासाठी सर्व समस्या निर्माण करते. अन्न नेहमी पचण्याजोगे आणि संतुलित असावे.
Follow us on

मुंबई : गरुड पुराण (Garuda Purana) व्यक्तीचे जीवन-मृत्यू आणि मृत्यूनंतरचे रहस्ये उघडकीस आणणारे म्हणून ओळखले जाते. सनातन धर्मात याला महापुराण असे नाव देण्यात आले आहे. गरुड पुराणात एकूण 16 अध्याय आहेत, ज्यात गरुड आणि भगवान नारायणाच्या संभाषणातून लोकांना भक्ती, सदाचार, वैराग्य, तपश्चर्या, त्याग, ज्ञान इत्यादी बद्दल सांगितले गेले आहे (Garuda Purana Says Remember These Five Mantras To Get Successfull In Life).

गरुड पुराणात एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन नित्यकर्माबद्दल देखील सांगण्यात आले आहे आणि अशा पाच गोष्टी नियमितपणे करण्याचा सल्ला देण्यात आला आहे ज्यामुळे आयुष्यात सकारात्मकता येते. सकारात्मक वृत्तीमुळे आपण आपले सर्व कार्य पूर्ण समर्पणाने करण्यास सक्षम आहात, परिणामी आपल्याला यश मिळते.

स्नानं दानं होमं स्वाध्यायो देवतार्तनम्
यस्मिन् दिने न सेव्यन्ते स वृथा दिवसो नृणाम्

1. या श्लोकाद्वारे गरुण पुराणात सांगितले गेले आहे की एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या नित्यकर्मामध्ये स्नान करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपला दिवस आंघोळीने सुरु केला पाहिजे. असे केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि मनाच्या पवित्रतेचा अनुभव होतो. याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीची वृत्तीही सकारात्मक बनते.

2. धार्मिक ग्रंथांत दानाचे मोठे महत्त्व दिले गेले आहे. जर एखाद्या व्यक्तीने आंघोळीनंतर दररोज आपल्या क्षमतेनुसार काहीतरी दान केले तर त्याने मन प्रसन्न होते, दुर्दैव दूर होते आणि आशीर्वाद प्राप्त होतात. अशा व्यक्तीला जीवनात अपार आनंद आणि यश मिळते.

3. घरातील प्रत्येक व्यक्तीने दररोज दिवा लावावा. एका दिव्याची ज्योत संपूर्ण घराचे वातावरण शुद्ध करते. जर आपण हवन करु शकत असाल तर ते अधिक चांगले आहे. शुद्ध वातावरणामुळे, रोग आणि नकारात्मकता घरापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत त्याची प्रकृती कधीच माणसाच्या कार्माच्या मार्गात येत नाही आणि परिश्रमाच्या जोरावर तो हवं ते मिळवतो.

4. प्रत्येक व्यक्तीने दररोज काही वेळ परमेश्वराच्या कोणत्याही मंत्राचा जप करावा. जप करण्यामध्ये बरीच शक्ती आहे. जप व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण करते आणि सकारात्मकता राहाते. यामुळे व्यक्तीचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा वाढते.

5. ज्याप्रमाणे शरीराला सर्व रोगांपासून वाचवण्यासाठी आंघोळ केली जाते त्याचप्रमाणे मनाच्या शुध्दीकरणासाठी उपासनेची आवश्यकता असते. उपासना मनाला शांत करते आणि देवावर विश्वास वाढवते. अशा व्यक्तीला भीती वाटत नाही आणि घरापासून सर्व प्रकारच्या समस्या दूर राहातात.

Garuda Purana Says Remember These Five Mantras To Get Successfull In Life

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Garuda Purana | ‘या’ सवयींमुळे देवी लक्ष्मी होतात नाराज, गरुड पुराणातही आहे याचा उल्लेख