AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Chalisa : या कारणासाठी रोज करावा हनुमान चालीसाचा पाठ, होताता चमत्कारिक फायदे

Hanuman Chalisa एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालिसाचे पठण करावे. त्याचे सर्व संकट दूर होतात. चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणते फायदे होतात.

Hanuman Chalisa : या कारणासाठी रोज करावा हनुमान चालीसाचा पाठ, होताता चमत्कारिक फायदे
हनुमान Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 10, 2023 | 8:13 AM
Share

मुंबई : हनुमान चालिसाशिवाय (Hanuman Chalisa) हनुमानजीची पूजा पूर्ण होत नाही. हनुमान चालीसा ही कवी तुलसीदास यांनी लिहिली होती, शास्त्रात तिचे खूप महत्त्व आहे. असे म्हणतात की याचा जप केल्याने शक्ती, धैर्य आणि संरक्षण मिळते. एखाद्या व्यक्तीवर कोणतेही संकट आले तर हनुमानाची पूजा करताना हनुमान चालिसाचे पठण करावे. त्याचे सर्व संकट दूर होतात. चला जाणून घेऊया हनुमान चालिसाचे पठण केल्याने कोणते फायदे होतात. शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे 100 वेळा पठण करावे. परंतु जर तुम्ही हे करू शकत नसाल तर किमान 7, 11 किंवा 21 वेळा पठण करावे. हनुमान चालिसाच्या एका ओळीत या गोष्टीचा उल्लेख आहे.

हनुमान चालिसाचा जप करण्याचे फायदे

  • जर एखाद्या व्यक्तीच्या घरात कौटुंबिक कलह बराच काळ चालू असेल, तर दर मंगळवारी हनुमानजीची पूजा करून हनुमान चालिसाचा पाठ केल्यास कलह दूर होतो.
  • हनुमान चालिसाचा जप केल्याने नकारात्मक ऊर्जा संपते आणि भूत-प्रेतांच्या सावलीपासूनही मुक्ती मिळते.
  • रोज हनुमान चालिसाचा पाठ करणार्‍या लोकांपासून संकटे आणि नकारात्मक उर्जा नेहमी दूर राहतात.
  • हनुमानजी सर्वात शक्तिशाली आणि महावीर आहेत, त्यांचे ध्यान केल्याने मनुष्य बलवान होतो आणि शक्ती प्राप्त होते.
  • हनुमान चालिसाचा पाठ केल्याने सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. हे पाठ केल्याने माणसाचे आरोग्य सुधारते आणि त्याच्या सर्व वेदनांचा अंत होतो.
  • हनुमानजी विद्वान आणि प्रतिभावान तसेच ज्ञानी आहेत. हनुमान चालिसाचे पठण जे खऱ्या मनाने करतात त्यांना बुद्धी आणि कुशाग्रताही प्राप्त होते.
  • हनुमान चालिसाचा पाठ केल्याने शरीरात सकारात्मकता येते आणि वाईट विचार नष्ट होतात. ते सतत वाचल्याने तणावाचा काळही संपतो.
  • भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनिधि दाता आहेत. जेव्हा जेव्हा कोणावर आर्थिक संकट येते तेव्हा मनापासून हनुमानजीचे ध्यान करून या चालिसाचा पाठ सुरू करा. हे खूप लवकर फायदे देते.

हनुमान चालिसाचे पठण करण्याची योग्य वेळ कोणती?

हनुमान चालिसाचे पठण करण्याची उत्तम वेळ पहाटे किंवा संध्याकाळ मानली जाते. पण हे लक्षात ठेवा की हनुमान चालिसाचा पाठ करताना त्यापूर्वी स्नान करून शुद्ध व्हावे. दुसरीकडे, जर तुम्ही संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर तुमचे हात पाय चांगले धुवा आणि स्वच्छ कपडे घाला आणि नंतर पठण सुरू करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.