लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम, जाणून घ्या पौराणिक कथा

| Updated on: Oct 22, 2021 | 4:11 PM

असे म्हटले जाते की लंकेत रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम आणि त्यांचे कुटुंब पुष्पक विमान मार्गे अयोध्येला आले. त्यावेळी रावणाचा भाऊ विभीषण याने राम कुटुंबाला पुष्पक द्वारे अयोध्येला पाठवले होते, त्यामुळे ते लंकेहून अयोध्येला इतक्या लवकर पोहोचले.

लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम, जाणून घ्या पौराणिक कथा
लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम
Follow us on

मुंबई : रामायणाबद्दल अनेक कथा आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशी एक कथा आहे, जी फार कमी लोकांना माहीत आहे. विशेष गोष्ट अशी आहे की ही कथा दसरा आणि दिवाळी दरम्यानची आहे. वास्तविक, दसऱ्यानंतर दिवाळी 20 दिवसांनी येते. असे म्हटले जाते की, भगवान रामाने दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला आणि त्यानंतर ते अयोध्येला रवाना झाले. त्यांना लंकेहून अयोध्येला जाण्यासाठी सुमारे 18 दिवस लागले आणि जेव्हा ते अयोध्येला पोहोचले तेव्हा त्या दिवशी दिवाळी साजरी करण्यात आली. यावरुन हे कळते की भगवान रामला लंकेहून अयोध्येला जाण्यासाठी सुमारे 18-20 दिवस लागले. अशा परिस्थितीत, आता लोकांचा प्रश्न आहे की भगवान राम लंकेतून 20 दिवसात अयोध्येला कसे पोहचले, कारण त्यावेळी वाहने नव्हती. जाणून घ्या याचे उत्तर आणि याच्याशी संबंधित रामायणाची कथा. (How Lord Rama reached Ayodhya, many kilometers away from Lanka, in 20 days, know mythology)

गुगल मॅपचाही अँगल?

वास्तविक, आता बरेच लोक गुगल मॅपच्या आधारे प्रश्न उपस्थित करतात की भगवान राम लंकेतून इतक्या लवकर अयोध्येला कसे पोहोचले? लंका आणि अयोध्येचे अंतर गुगल मॅपवर 3150 किमी दाखवते आणि चालण्याचे अंतर देखील 20 दिवसात येते. अशा परिस्थितीत, लोक म्हणतात की भगवान राम सतत 20 दिवस कोणत्याही विश्रांतीशिवाय चालत होते, कारण त्यांनाही तिथून अयोध्या गाठण्यासाठी 20 दिवस लागले.

भगवान राम कसे आले?

रामायणातील कथांनुसार भगवान राम लंकेहून पायी अयोध्येला आले नव्हते. असे म्हटले जाते की लंकेत रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम आणि त्यांचे कुटुंब पुष्पक विमान मार्गे अयोध्येला आले. त्यावेळी रावणाचा भाऊ विभीषण याने राम कुटुंबाला पुष्पक द्वारे अयोध्येला पाठवले होते, त्यामुळे ते लंकेहून अयोध्येला इतक्या लवकर पोहोचले.

पुष्पक कोणाकडे होते?

असे म्हटले जाते की हे विमान ब्रह्माजींनी कुबेराला भेट दिले होते पण रावणाने कुबेराकडून पुष्पक हिसकावले. वाल्मिकी रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण करून तिला या विमानातून आणले होते आणि अखेरीस रावणाचा वध केल्यानंतर भगवान राम, लक्ष्मण आणि सीता पुष्पक विमानाने अयोध्येला परतले.

असे म्हटले जाते की, या विमानाचे वैशिष्ट्य असे होते की यात कितीही प्रवासी चढू शकत असले तरी एक खुर्ची नेहमी रिकामीच रहात होती. पुष्पक विमान प्रवाशांची संख्या आणि हवेच्या घनतेनुसार त्याचा आकार वाढवू किंवा कमी करू शकते. पुष्पक विमान केवळ एका ग्रहावरच नाही तर इतर ग्रहांपर्यंतही प्रवास करण्यास सक्षम होते. पुष्पक विमानाचे अनेक भाग सोन्याचे बनलेले होते. हे विमान प्रत्येक हंगामासाठी अतिशय आरामदायक आणि पाहण्यास अतिशय आकर्षक होते. (How Lord Rama reached Ayodhya, many kilometers away from Lanka, in 20 days, know mythology)

इतर बातम्या

Mars Transit 2021 : तूळ राशीत सूर्य आणि मंगळाची झाली युती, या राशींचे चमकू शकते भाग्य

Chanakya Niti | मुलांच्या संगोपनाबाबत प्रश्न पडलेत?, चाणक्य नितीत सांगितलेल्या 5 गोष्टी नक्की करा