AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaganaath Puri : जगन्नथ पूरीचे पाच मोठे रहस्य, विज्ञानालाही देत आहे आव्हान!

सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक दररोज या श्रद्धास्थानाला भेट देतात.

Jaganaath Puri : जगन्नथ पूरीचे पाच मोठे रहस्य, विज्ञानालाही देत आहे आव्हान!
जगन्नाथ धामImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 16, 2023 | 11:45 AM
Share

मुंबई : ओडिशामध्ये स्थित जगन्नाथ मंदिर (Jagannath Puri Temple) हे भगवान विष्णू, श्री कृष्णाचे पृथ्वीवरचे वैकुंठ रूप मानले जाते. असे म्हणतात की पुरीचे हे पौराणिक मंदिर अति प्राचिन आहे. या मंदिराशी निगडित इतिहास खूपच थक्क करणारा आहे. जगन्नाथ मंदिरातील मूर्तींमध्ये आजही श्रीकृष्णाचे हृदय धडधडते अशी धार्मिक धारणा आहे. सनातन परंपरेत जगन्नाथ मंदिर हे वैष्णव परंपरेतील सर्वात मोठे तीर्थस्थान मानले जाते. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातील हजारो भाविक दररोज या श्रद्धास्थानाला भेट देतात. पुरीचे हे मंदिर भगवान कृष्णाला समर्पित आहे, पण तिथे त्याला जगन्नाथ धाम म्हणून ओळखले जाते. पुरीच्या या मंदिरात, हिंदू धर्माशी संबंधित चार प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक, भगवान जगन्नाथ आणि त्यांचा मोठा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्या मूर्ती दिसतात.

जगन्नाथ धामचे हे रहस्य आहेत थक्क करणारे

  1. असे मानले जाते की जगन्नाथ मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी 7 भांडी एकावर एक ठेवली जातात, ज्यामध्ये सर्वात वरच्या भांड्यातला प्रसाद आधी शिजतो, तर वरून खाली अशा क्रमाने एकामागून एक प्रसाद शिजत जातो. हे एक आश्चर्यच आहे.
  2. मंदिरात दिवसा समुद्राकडून जमिनीवर वारा वाहत असल्याचे मानले जाते. संध्याकाळी वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावरील ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरूद्ध दिशेला फडकतो.
  3. जगन्नाथ मंदिराची उंची सुमारे 214 फूट असल्याचे मानले जाते. अशा स्थितीत पशू-पक्ष्यांची सावली निर्माण होते मात्र या मंदिराच्या शिखराची सावली कायमच गायब राहते.
  4. पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर कधीही विमान उडत नाही किंवा मंदिराच्या शिखरावर पक्षी बसत नाही. हे भारतातील कोणत्याही मंदिरात पाहिले गेले नाही.
  5. मंदिरात दर 12 वर्षांनी जगन्नाथासह तिन्ही मूर्ती बदलल्या जातात. त्यानंतर तेथे नवीन मूर्ती बसवल्या जातात. देवाच्या मूर्ती बदलताना शहराची वीज खंडित केली जाते. यासोबतच मंदिराबाहेर प्रचंड सुरक्षा दल तैनात करण्यात येते. त्या काळात मंदिरात फक्त पुजारीच प्रवेश करू शकततात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.