Kamika Ekadashi 2022: कामिका एकादशीला जुळून येत आहे तीन योग, मुहूर्त आणि महत्त्व

| Updated on: Jul 21, 2022 | 11:43 AM

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी कामिका एकादशी व्रत (Kamika ekadashi vrat) म्हणून ओळखली जाते. कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या (Bhagwan Vishnu) गदा धारण केलेल्या रुपाची पूजा केली जाते. श्रावणातील (Shravan) पहिली एकादशी 24 जुलै रोजी रविवारी येत आहे. या दिवशी तीन शुभ योग तयार होत […]

Kamika Ekadashi 2022: कामिका एकादशीला जुळून येत आहे तीन योग, मुहूर्त आणि महत्त्व
Follow us on

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाची एकादशी कामिका एकादशी व्रत (Kamika ekadashi vrat) म्हणून ओळखली जाते. कामिका एकादशी व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश करते असे मानले जाते. कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या (Bhagwan Vishnu) गदा धारण केलेल्या रुपाची पूजा केली जाते. श्रावणातील (Shravan) पहिली एकादशी 24 जुलै रोजी रविवारी येत आहे. या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. हे तिन्ही योग उपासनेच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जातात. असे मानले जाते की या योगांमध्ये पूजा केल्याने व्यक्तीला उपासनेचे दुप्पट फळ मिळते. या तीन योगांबद्दल आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया.

द्विपुष्कर योग

ज्योतिष शास्त्रानुसार द्विपुष्कर योगात केलेले कार्य दुप्पट वाढते. या योगात मौल्यवान वस्तू खरेदी करणे शुभ असते असे सांगितले जाते.

वृद्धि योग

शास्त्रानुसार या योगात पूजा केल्याने मिळणारे पुण्य वाढते. तसेच या योगात केलेले कार्यही वाढते.

हे सुद्धा वाचा

ध्रुव योग

या योगात कोणतेही स्थिर काम केल्याने यश मिळते असे मानले जाते. इमारत बांधणीसाठी हा योग चांगला मानला जातो.

 

मुहूर्त

श्रावण महिन्यात येणारी एकादशी तिथी 23 जुलै, शनिवारी सकाळी 11.27 वाजता सुरू होईल. तर तारीख 24 जुलै रोजी दुपारी 01:45 वाजता समाप्त होईल. लगेच त्याचदिवशी 24 जुलै रोजी एकादशीचे व्रत ठेवण्यात येणार आहे. या दिवशी द्विपुष्कर योग 23 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू होईल आणि 24 जुलै रोजी सकाळी 05:38 वाजता सुरू होईल. त्याचबरोबर वृद्धी योगाची निर्मिती सकाळपासून दुपारी 02:02 पर्यंत आहे आणि ध्रुव योग दुपारी 02:02 पासून सुरू होत आहे.

महत्त्व

गंगा, काशी, नैमिशरण्य आणि पुष्करमध्ये स्नान केल्याने जे फळ मिळते ते भगवान विष्णूची पूजा केल्याने प्राप्त होते. कुरुक्षेत्र आणि काशीमध्ये सूर्य आणि चंद्र ग्रहणांवर स्नान करून, सागर, जंगलासह पृथ्वी दान करून जे फळ प्राप्त होत नाही, ते भगवान विष्णूची पूजा करून प्राप्त होते.

जे श्रावणात देवाची पूजा करतात, सर्व देवता, गंधर्व आणि सूर्य इत्यादी त्यांची पूजा करतात. अर्थात ज्या लोकांना पापांची भीती वाटते त्यांनी कामिका एकादशीचे व्रत करावे आणि भगवान विष्णूची पूजा करावी. या एकादशीचे व्रत आणि भगवान विष्णूची उपासना पापाच्या चिखलात अडकलेल्या आणि जगाच्या महासागरात विसर्जित झालेल्या मनुष्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. पापांपासून मुक्त होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग नाही. जे लोक या एकादशीला भक्तिभावाने भगवान विष्णूला तुळशी दल अर्पण करतात, ते या जगातील सर्व पापांपासून दूर राहतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)