
आचार्य चाणक्यांच्या मते तुमच्या सवयी तुमच्या आयुष्याला वळण देतात. जेव्हा एखादी व्यक्ती सतत मेहनत करून त्याचे ध्येय गाठते, तेव्हा अशा व्यक्तिंचा शत्रूही त्याची स्तुती करतात. आयुष्यात माणसाचा स्वतःवर पूर्ण विश्वास असायला हवा. आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा जर आपण अवलंब केला तर माणूस कधीही मागे वळून पाहात नाही. पण काही सवयी तुमचे नुकसान करु शकतात.

राग हा माणसाचा शत्रू आहे. रागावलेला माणूस कधीही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. रागाच्या भरात तो चुकीचे निर्णय घेतो आणि आपल्या हट्टाला चिकटून राहतो. अशी व्यक्ती आयुष्यात खूप काही गमावतात. अशा लोकांवर माता लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.

जर तुम्हाला देवी लक्ष्मीच्या कृपेने पैसा मिळेल असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग करा. पण जे लोक गर्वाने इतरांचा अपमान करतात, त्यांच्यावर माता लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. अशा लोकांचा पैसा उद्ध्वस्त होण्यासाठी वेळ लागत नाही.

माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा लोभ. लोभी माणसाला बरेच काही मिळू शकते, परंतु त्याची इच्छा कधीच संपत नाही. तो इतरांच्या गोष्टींकडे वाईट नजर ठेवतो आणि त्या गोष्टी स्वत:कडे घेण्याचा प्रयत्न करतो. अशा व्यक्तीला समाधान किंवा शांती नसते. म्हणूनच जगातील सर्वात मोठा शत्रू हा लोभ आहे. ज्याने लोभावर विजय मिळविला आहे, त्याने आयुष्याची अर्धी लढाई जिंकली, असे म्हटले जाते.

लक्ष्मी देवीची कृपा मिळवायची असेल तर आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. आळशी माणूस आपला वेळ वाया घालवतो आणि स्वतःचे भांडवलही वाया घालवतो. अशा लोकांवर देवी लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही.