Mahashivratri 2023: महादेवाला तुळस का वाहू नये, अनेकांना माहिती नाही हे कारण

यावेळी 18 फेब्रुवारीला शिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे. तुम्हाला माहित आहे का की शिवाला कुंकू, हळद किंवा तुळशीची पाने कधीही अर्पण केली जात नाहीत.

Mahashivratri 2023: महादेवाला तुळस का वाहू नये, अनेकांना माहिती नाही हे कारण
महाशिवरात्री
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 14, 2023 | 9:08 AM

मुंबई, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा हिंदू परंपरेतील फार मोठा सण आहे. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाचा विवाह झाला होता. महादेवाची आराधना केल्याने माणसाला जीवनात पूर्ण आनंद मिळू शकतो. यावेळी 18 फेब्रुवारीला शिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा होणार आहे. तुम्हाला माहित आहे का की शिवाला कुंकू, हळद किंवा तुळशीची पाने कधीही अर्पण केली जात नाहीत. याशिवाय शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करण्यासही मनाई आहे. याचे कारण आज आपण जाणून घेऊया.

शिवलिंगावर कुंकू का अर्पण केला जात नाही?

भगवान शंकराच्या पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुलं इत्यादी साहित्य अर्पण केले जाते. पण कुंकू कधीच अर्पण केला जात नाही. खरं तर, हिंदू धर्मात, स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू लावतात, तर भगवान शिवाचे एक रूप देखील विनाशक असल्याचे मानले जाते. त्याच्या विनाशकारी स्वभावामुळे शिवलिंगावर कुंकू अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.

शिवलिंगावर हळद का अर्पण केली जात नाही

हिंदू धर्मात हळद अत्यंत शुद्ध आणि पवित्र मानली जाते. असे असूनही त्याचा उपयोग शिवपूजेत केला जात नाही. शास्त्रानुसार शिवलिंग हे पुरुष तत्वाचे प्रतिक असून हळदीचा संबंध स्त्रियांशी आहे. यामुळेच भोलेनाथला हळद अर्पण केली जात नाही. केवळ महाशिवरात्रीलाच नाही तर इतर कोणत्याही प्रसंगी भगवान शिवाला किंवा शिवलिंगाला हळद अर्पण केली जात नाही.

शिवलिंगावर तुळशी का अर्पण केली जात नाही?

तुळशीचा जन्म तिच्या मागील जन्मी राक्षस कुळात झाला. तिचे नाव वृंदा होते, जी भगवान विष्णूची परम भक्त होती. वृंदाचा विवाह राक्षस राजा जालंधरशी झाला होता. पत्नीच्या भक्तीमुळे आणि विष्णूकवचमुळे जालंधनला अमरत्वाचे वरदान लाभले. एकदा जालंधर देवतांशी लढत असताना वृंदा पूजेला बसली आणि पतीच्या विजयासाठी विधी करू लागली. ऊपासाच्या प्रभावामुळे जालंधर हरवत नव्हते. तेव्हा भगवान शिवाने त्याचा वध केला. वृंदाला आपल्या पतीच्या निधनाने खूप दुःख झाले आणि तिने रागाने शिवजींना शाप दिला की तुळशीदळ त्यांच्या पूजेत कधीही वापरणार नाही.

शिवलिंगाला शंखाने जल अर्पण केले जात नाही

शिवलिंगावर कधीही शंख घेऊन जल अर्पण करू नये. प्रत्येक देवतेच्या पूजेत शंख वापरला जातो. पण महादेवाच्या पूजेत कधीच वापरला जात नाही. शिवपुराणानुसार, शंखचूड एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा वध स्वतः भगवान शिवाने केला होता. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाला कधीही शंखतून जल अर्पण केले जात नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us