AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलींगावर अर्पण करा या गोष्टी, भोलेनाथाच्या कृपेने सर्व मनोकामना पुर्ण

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात समृद्धी येते आणि वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्तता मिळते. यावेळी 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे.

Mahashivratri 2023: महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलींगावर अर्पण करा या गोष्टी, भोलेनाथाच्या कृपेने सर्व मनोकामना पुर्ण
शिवलींगImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2023 | 4:55 PM
Share

मुंबई, महाशिवरात्री (Mahashivratri 2023) हा हिंदूंचा मोठा सण मानला जातो. या दिवशी भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रार्थना करतात. जे सर्व नियम पाळून पूजा करतात त्यांना भोले नाथाचा आशीर्वाद नक्कीच मिळतो. असे मानले जाते की, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाचा विवाह माता पार्वतीशी झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात समृद्धी येते आणि वैवाहिक जीवनातील सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्तता मिळते. यावेळी 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. चला जाणून घेऊया शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात.

भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी या वस्तू अर्पण करा

1. दूध- महाशिवरात्रीला दुधासह भोले बाबाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी भगवान शिवाच्या रुद्राभिषेकाचे विशेष महत्त्व आहे. शिवलिंगाला दुधाने रुद्राभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. यासोबतच या दिवशी दूध दान करणे देखील खूप शुभ मानले जाते.

2. पाणी- ओम नमः शिवायःचा जप करताना शिवलिंगावर जल अर्पण केल्यास मन शांत राहते. मान्यतेनुसार, विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी त्याच्यावर पाणी ओतले होते. तेव्हापासून ते नीलकंठ या नावाने ओळखल्या जातात.

3. बिल्वपत्र- बिल्वपत्र हे देवाच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे तीन पानांचे बिल्वपत्र भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. भगवान आशुतोषाच्या पूजेत अभिषेक आणि बिल्वपत्राला प्रथम स्थान आहे.

4. केशर- शिवलींगावर चंदनाचा लेप लावल्याने मांगलिक दोष समाप्त होतो. महाशिवरात्रीला आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रांवर टिळक कुंकू लावल्यास सर्व अडचणी दूर होतील आणि व्यवसाय कधीच मंदावणार नाही, असे म्हटले जाते.

5. अत्तर- शिवलिंगावर अत्तर शिंपडणे शुभ मानले जाते. अत्तर शिंपडल्याने आपले मन शुद्ध होते आणि आपण वाईट प्रवृत्तींपासून मुक्त होतो. भोले बाबावर अत्तर शिंपडल्याने भक्तांना बुद्धी प्राप्त होते आणि ते सत्याच्या मार्गापासून कधीच भरकटत नाहीत.

6. दही- भगवान शिवाला दही अर्पण केल्याने माणूस परिपक्व होतो आणि त्याच्या आयुष्यात स्थिरता येते. भोले बाबांना नियमितपणे दही अर्पण केल्यास जीवनातील सर्व अडचणी, अडचणी दूर होतात, अशीही एक धारणा आहे.

7. तूप- देशी तूप हे शक्तीचे प्रतीक आहे. म्हणूनच शिवलिंगावर तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान होतो. अपत्यप्राप्तीसाठी भगवान शंकराला तूप अर्पण करावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...