AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu for Career growth: प्रचंड मेहनतीनंतरही यश मिळत नाही? असू शकतो वास्तुदोष, एकदा तपासून पाहा

Vastu for Career growth: तुम्ही जीव तोडून मेहनत करत आहात, पण तरीही यश तुमच्यापासून दूर आहे का? तुम्हाला वारंवार अपयशाचा सामना करावा लागत आहे का? जर होय, तर यामागे तुमच्या घरातील वास्तुदोष हे एक मोठे कारण असू शकते. होय, वास्तुशास्त्रानुसार, घरातील काही कमतरता तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात.

Vastu for Career growth: प्रचंड मेहनतीनंतरही यश मिळत नाही? असू शकतो वास्तुदोष, एकदा तपासून पाहा
Vastu DoshImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 22, 2025 | 5:22 PM
Share

आपण अनेकदा पाहतो की काहीजण प्रचंड मेहनत करतात, पण त्यांना हवे तसे यश मिळत नाही. अनेकदा पात्रता, परिश्रम आणि योग्य संधी असूनही प्रगती थांबते. अशा परिस्थितीत व्यक्ती स्वतःच्या नशिबाला किंवा वेळेला दोष देऊ लागते. परंतु वास्तुशास्त्रानुसार घर किंवा कार्यस्थळावरील वास्तुदोष हे देखील यामागील मोठे कारण असू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या वास्तू कारणांमुळे मेहनतीचे फळ हातातून निसटते आणि त्यावर उपाय काय आहेत.

यशात अडथळा आणणारे वास्तुदोष पुढील असू शकतात-

चुकीच्या दिशेने डोके ठेवून झोपणे:

जर तुम्ही दक्षिण दिशेला पाय ठेवून झोपत असाल, तर याचा तुमच्या झोपेवर नकारात्मक परिणाम होतो आणि आरोग्यही बिघडते. याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होतो.

वाचा: आज संजय आला आहे, इथे हिंदीत… संजय मिश्राने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

उपाय: नेहमी दक्षिण दिशेला डोके ठेवून झोपा. यामुळे तुम्हाला चांगली झोप आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकाल.

घराचे मुख्य प्रवेशद्वार:

घराचे मुख्य प्रवेशद्वार केवळ ये-जा करण्याचा मार्ग नसून, सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार देखील आहे.

खराब मुख्य द्वार: जर तुमचे मुख्य प्रवेशद्वार तुटलेले, घाणेरडे किंवा त्यापुढे कोणताही अडथळा असेल, तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

उपाय: मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा. त्यावर नावाची पाटी लावा आणि त्याच्या आसपास पुरेशी प्रकाशाची व्यवस्था करा.

पाण्याचा चुकीचा प्रवाह:

वास्तुशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

पाण्याची गळती: घरात नळातून सतत पाणी टपकणे किंवा पाण्याची गळती होणे अत्यंत अशुभ मानले जाते. हे धनाच्या नुकसानाचे लक्षण आहे.

उपाय: घरात कुठेही पाण्याची गळती असेल तर ती तात्काळ दुरुस्त करा.

स्नानगृह आणि स्वच्छतागृहाची दिशा:

वास्तुशास्त्रात स्नानगृह आणि स्वच्छतागृहाला नकारात्मक ऊर्जेचा स्रोत मानले जाते.

चुकीच्या दिशेतील स्नानगृह: घराच्या ईशान्य कोपऱ्यात (उत्तर-पूर्व) स्नानगृह किंवा स्वच्छतागृह असणे अत्यंत अशुभ मानले जाते. यामुळे धनहानी आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात.

उपाय: जर स्नानगृह चुकीच्या दिशेत असेल, तर त्याचे दरवाजे नेहमी बंद ठेवा आणि त्यात काचेच्या भांड्यात मीठ ठेवा. दर आठवड्याला हे मीठ बदला.

बेडरुमधील आरसा:

बेडच्या समोर आरसा असल्याने दांपत्याच्या नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो आणि व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्थिर वाटू शकते. याचा परिणाम कार्यक्षेत्रावरही दिसतो.

उपाय: शयनकक्षात आरसा लावू नका. जर लावणे आवश्यक असेल तर तो कापडाने झाकून ठेवा.

तुटलेले सामान आणि भंगार:

घरात पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स, तुटलेल्या मूर्ती किंवा कबाड नकारात्मक ऊर्जा वाढवतात. यामुळे प्रगती थांबते आणि मेहनतीनंतरही यश मिळत नाही.

उपाय: वेळोवेळी घराची साफसफाई करा आणि निरुपयोगी वस्तू घरातून काढून टाका.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.