AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हातावरची ही छोटी रेषा सांगेल, कधी होणार लग्न? कसे असेल वैवाहिक जीवन, एका क्लिकवर घ्या जाणून

Palmistry Marriage Lines: लग्न होणार की नाही ही आजच्या तरुणाईसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. त्यांना याविषयीची माहिती त्यांच्या हातावरील या रेषाच देतील. काय सांगता हस्तेषा तज्ज्ञ तुम्हाला माहिती आहे का?

हातावरची ही छोटी रेषा सांगेल, कधी होणार लग्न? कसे असेल वैवाहिक जीवन, एका क्लिकवर घ्या जाणून
ही छोटी रेषा सांगेल लग्नाची गोष्ट
| Updated on: Dec 26, 2025 | 4:20 PM
Share

Palmistry Marriage Lines: हस्तरेषेच्या मदतीने व्यक्तिमत्व, करिअर, भविष्य आणि लग्न केव्हा होईल याची माहिती मिळते असे सांगितले जाते. सध्या लग्नही मोठी समस्या ठरत आहे. मुलांची लग्न होत नसल्याने अनेक गावात आई-वडील चिंतेत आहेत. योग्य वयात अनेकांचे लग्न झालेले नाही. सध्या फसव्या लग्नाच्या अनेक घटना घडत आहेत. पैसे लुटणारे कुटुंबाला आणि तरुणाला मोह जाळ्यात अडकवून त्यांची फसवणूक करत आहेत. पण हातावरील रेषा तुम्हाला तुमच्या वैवाहिक आयुष्याबाबत माहिती देतात, असे हस्तरेषा शास्त्र सांगते.

हातावरील विवाह रेषा तरुणी-तरुणाचे लग्न कधी होणार हे सांगतात. काही ठिकाणी एकापेक्षा अधिक रेषा असतील तर अधिक नात्यात गुंतल्याचे लक्षात येईल. त्यासाठी हातावरील विवाह रेषा पाहावी लागेल. ही छोटी रेषा करंगळीच्या खाली बाहेरील बाजूस आडवी असते. या रेषेवरून लग्न दीर्घकाळ टिकेल की नाही हे समजते असा हस्तरेषा शास्त्राचा दावा आहे.

कोणत्या वयात होईल लग्न- जर विवाह रेषा हृदय रेषेच्या जवळून जात असेल तर लग्न कमी वयात होते. हृदय रेषा ही सर्वात वरच्या दिशेला असते. ही रेषा करंगळीपासून सुरु होते आणि तर्जनी (index finger) या मध्ल्या बोटापर्यंत (middle finger) जाते.

जर विवाह रेषा ही हृदय रेषा आणि करंगळीच्या मध्यभागी असेल तर लग्न 25 ते 30 वर्ष दरम्यान होते. जर ही विवाह रेषा करंगळीच्या अगदी समीप, जवळ असेल तर लग्न उशीरा होते असे हस्तरेषा शास्त्र सांगते. अशा लोकांचे लग्न हे साधारणपणे 35 वर्षानंतर होते. जर त्यापूर्वी लग्न झाले, तर लग्नात अडचणी येतात. वा विवाहानंतर गैरसमज होतात, असे हे शास्त्र सुचवते.

लग्न रेषेची स्थिती-जर लग्न रेषा अधिक स्पष्ट आणि खोल असेल तर वैवाहिक जीवन सुखी असते. तर ही लग्न रेषा मध्यभागी अंधुक, अस्पष्ट असेल तर नातेसंबंधात चढउतार दिसून येतो. अशावेळी दोघांमध्ये सामंजस्य टिकण्यात अडचण येते.

एका पेक्षा अधिक नाती-जर एका पेक्षा अधिक दोन अथवा त्यापेक्षा अधिक रेषा असतील तर एकापेक्षा अधिक प्रेमसंबंध असतात. त्यामुळे एकापेक्षा अधिक लग्न होण्याची शक्यता पण असते. जर दोन रेषा असतील आणि त्या एकमेकींना भेदत असतील तर मग वैवाहिक जीवनात ताणतणाव असल्याचे संकेत दिसतात असे हे शास्त्र सांगते.

डिस्क्लेमर: ही इंटरनेटवरील विविध स्त्रोतावरून घेतलेली सामान्य माहिती आहे. केवळ माहितीस्तव ती सादर करण्यात आलेली आहे. टीव्ही ९ मराठी या दाव्याची पुष्टी करत नाही.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ