AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Wari 2022: संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान

परळी, राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Plakhi 2022) शुक्रवारी परळीत आगमन झाले. कालचा मुक्काम झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे अंबाजोगाईकडे (Ambejogai) प्रस्थान झाले आहे. या पालखीचे परळीच्या (Parali) भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या दिंडीचे यंदा 53 वे वर्ष आहे. यात सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते, […]

Pandharpur Wari 2022: संत गजानन महाराजांची पालखी अंबाजोगाईकडे प्रस्थान
| Updated on: Jun 25, 2022 | 12:51 PM
Share

परळी, राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे (Gajanan Maharaj Plakhi 2022) शुक्रवारी परळीत आगमन झाले. कालचा मुक्काम झाल्यानंतर श्रींच्या पालखीचे अंबाजोगाईकडे (Ambejogai) प्रस्थान झाले आहे. या पालखीचे परळीच्या (Parali) भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या दिंडीचे यंदा 53 वे वर्ष आहे. यात सातशे वारकरी सहभागी झाले आहेत. राम कृष्ण हरी, गण गण गणात बोते, संत ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषा बरोबरच टाळ-मृदुंगाने परिसर दुमदुमला आहे. हातात भगवा पताका, पांढरे शुभ्र वस्त्र आणि मुखात विठुरायाचे नामस्मरण करीत अतिशय शिस्तीत ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या वारीमध्ये विशेष महत्त्व असते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पालखी सोहळ्यात खंड पडला होता. त्यामुळे यंदाच्या वारीत वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर पार करून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. यावर्षी संत गजानन महाराजांच्या दिंडीचं हे 53 वर्ष आहे. गेल्यावर्षी  शेगाव संस्थानचे कार्यकारी विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव निळकंठ दादा पाटील यांनी विधिवत पूजा आरती करून 6 जूनला  पालखीला प्रस्थानासाठी शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर मोठ्या दिमाखात गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.