AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakshabandhan 2023 : या वर्षी दोन दिवस साजरा होणार रक्षा बंधन, जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

दरवर्षी श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान येतो, परंतु यावर्षी श्रावण महिन्यात अधिक महिना आहे. या कारणास्तव, श्रावण एक ऐवजी दोन महिन्यांचा असेल.

Rakshabandhan 2023 : या वर्षी दोन दिवस साजरा होणार रक्षा बंधन, जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त
रक्षा बंधनImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 30, 2023 | 10:52 AM
Share

मुंबई : रक्षाबंधन (Rakshabandhan 2023) हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. श्रावण महिन्यात साजऱ्या होणाऱ्या या सणाची बंधू-भगिनी आतुरतेने वाट पाहतात. रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. दरवर्षी श्रावण पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा सण 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान येतो, परंतु यावर्षी श्रावण महिन्यात अधिक महिना आहे. या कारणास्तव, श्रावण एक ऐवजी दोन महिन्यांचा असेल. श्रावण 18 जुलैपासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबरला संपेल. अशा प्रकारे रक्षाबंधन नेहमीपेक्षा सुमारे 15 दिवस उशिराने साजरा केला जाईल. एवढेच नाही तर रक्षाबंधन एका ऐवजी दोन दिवस साजरे केले जाणार आहे. एवढेच नाही तर रक्षाबंधनाच्या दिवशीही भाद्रा येणार आहे.

रक्षाबंधन 2 दिवस साजरे केले जाऊ शकते

हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी श्रावण महिन्याची पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.58 पर्यंत सुरू आहे. अशाप्रकारे, रक्षाबंधन साजरा करण्याचा शुभ मुहूर्त 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10.58 वाजल्यापासून सुरू होतो आणि 31 ऑगस्ट रोजी सकाळी 7.58 पर्यंत चालू राहील. म्हणजेच रक्षाबंधन दोन्ही दिवशी साजरे करता येईल. पण 30 ऑगस्टच्या सकाळी 10.58 वाजता भद्रा सुरू होईल आणि 30 ऑगस्टच्या रात्री 9.15 वाजता संपेल. त्यामुळे 30 ऑगस्ट रोजी रात्री 9:01 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:05 पर्यंत बहिणी आपल्या भावांना राखी बांधू शकतील.

म्हणूनच भद्रकालात राखी बांधली जात नाही

धार्मिक शास्त्रांमध्ये भद्रकाल हे शुभ कार्य करण्यासाठी अशुभ मानले गेले आहे. भाद्र काळात केलेले शुभ कार्यही अशुभ फळ देते. विशेषत: भद्रामध्ये राखी बांधण्यास सक्त मनाई आहे. खरे तर भाद्र काळात रावणाच्या बहिणीने त्याला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. एवढेच नाही तर रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट केला. त्यामुळे भाद्रमध्ये राखी बांधल्याने भावाचे आयुष्य कमी होते अशी धार्मिक मान्यता आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.