AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangalsutra: सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राचे आहेत आरोग्यदायी फायदे

दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते.

Mangalsutra: सौभाग्याचं लेणं असलेल्या मंगळसूत्राचे आहेत आरोग्यदायी फायदे
मंगळसूत्र Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 08, 2022 | 8:38 AM
Share

मंगळसुत्रला (Mangalsutra) भारतीय संस्कृतीत सौभाग्याचं लेणं मानल्या जातं. प्राचीन काळापासून स्त्रियांच्या या दागिन्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार मंगळसूत्र घालण्याचा संबंध थेट पतीच्या दीर्घायुष्याशी जोडल्या गेला आहे. असे मानले जाते की मंगळसूत्र पतीचे आयुष्य वाढवते. ते धारण केल्याने पती-पत्नीमध्ये प्रेम आणि बांधिलकी टिकून राहते. त्यामुळे लग्नात मुलींना मंगळसूत्र घातले जाते. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये ‘मांगल्यतंतू’ असेही म्हणतात. यात दोन पदरी दो-यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी व 2 लहान वाट्या असतात. एक पती, दुसरी पत्नीकडील. दोन दोरे म्हणजे पती-पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ. आजकाल मंगळसूत्राच्या रचनेत अनेक बदल पाहायला मिळत आहेत, पण आजही खरे मंगळसूत्र हे काळे मणी आणि दोन वाट्याचे डिझाइन असलेले मानले जाते. दक्षिण भारतात आजही फक्त दोन वाट्यांच्या डिझाइनची मंगळसूत्रेच घातली जातात, पण तेथे काळ्या मण्यांऐवजी पिवळा धागा वापरण्याची पद्धत आहे.

मंगळसूत्राची आरोग्यदायी फायदे

दोन सोन्याच्या वाट्या आणि काळ्या मण्यांनी बनवलेल्या मंगळसूत्राचे अनेक महत्त्व आहे. सोन्याचे दोन वाट्या सत्वगुणांशी  संबंधित आहेत, जे शिव आणि शक्तीचे प्रतीक दर्शवते. हृदययाच्या संबंधित समस्या दूर ठेवण्यासाठी देखील हे लाभदायक मानल्या जाते. शक्यतो या वाट्यांवर कुठल्याही प्रकारचे डिझाईन नसावे. यासोबतच  काळे मोती वाईट नजर आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात असे मानले जाते.  शास्त्रानुसार मंगळसूत्रांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील  रक्तदाब  नियंत्रणात ठेवते. याच कारणामुळे ते छातीजवळ घातल्या जाते.  यासोबतच मंगळसूत्रातील तीन गाठी वैवाहिक जीवनातील तीन मुख्य गोष्टी दर्शवतात. प्रथम, गाठ एकमेकांबद्दल आदर, दुसरी पालकांबद्दलचे प्रेम आणि तिसरी गाठ देवाबद्दल आदर ठेवण्याची आठवण करून देते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.