AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rudraksha: रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या रूद्राक्ष धारण करण्याचे नियम

रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला धार्मिक फायदे तर मिळतातच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

Rudraksha: रूद्राक्ष धारण करण्याचे आहेत असंख्य फायदे, जाणून घ्या रूद्राक्ष धारण करण्याचे नियम
रूद्राक्षImage Credit source: Social Media
| Updated on: Jan 03, 2023 | 3:31 PM
Share

मुंबई, हिंदू धर्मात रुद्राक्षाला (Rudraksha Benefits) भगवान शिवाचे  प्रतीक मानले जाते. भगवान शिवाच्या अश्रूंपासून रुद्राक्ष झाला अशी धार्मिक मान्यता आहे, त्याचमुळे त्याला  सर्वात पवित्र मानला जातो, तसेच हे भगवान शिवाचे सर्वात प्रिय देखील आहे. मान्यतेनुसार, जे लोकं रुद्राक्ष धारण करतात त्यंच्यावर भगवान शिवाची विशेष कृपा असते. म्हणूनच बहुतेक शिवभक्त रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष धारण केल्याने तुम्हाला धार्मिक फायदे तर मिळतातच पण ते आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, या सर्व रुद्राक्षांची स्वतःची स्वतंत्र शक्ती आहे.

ज्योतिषशासत्रामध्ये  असे मानले जाते की रुद्राक्ष धारण केल्याने सर्व संकटे दूर होतात.  एकमुखी रूद्राक्षापासुन ते एकवीस एकविस मुखी रूद्राक्षापर्यंत त्याचे पर्याय आढळतात. प्रत्येकाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे.

शरीर आणि मनासाठी फायदेशीर

  1. रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, जी रोगांशी लढते, त्यामुळे आरोग्य सुधारते. आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो. याने रक्तातील अशुद्धता दूर होते. हे मानवी शरीराच्या आतून तसेच बाहेरील बॅक्टेरिया काढून टाकते. रुद्राक्ष डोकेदुखी, खोकला, पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करतो.
  2. रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते, ज्यामुळे व्यक्तिमत्व शांत आणि आकर्षक बनते. जपासाठी रुद्राक्षाचे मणी वापरतात. नामजपाच्या प्रक्रियेमुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे रुद्राक्षाच्या बिया आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ देण्यासाठी उपयुक्त आहेत.
  3. रुद्राक्ष धारण केल्याने मागील जन्मातील पापांचा नाश होतो ज्यामुळे वर्तमान जीवनात अडचणी येतात. रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य रुद्राचे रूप प्राप्त करू शकतो. हे सर्व पापांपासून मुक्त होण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यास मदत करते.
  4. रुद्राक्ष वाईट आणि नकारात्मक प्रभाव दूर करतो रुद्राक्ष हा आध्यात्मिक मणी मानला जातो. प्राचीन काळापासून याचा उपयोग आध्यात्मिक शक्ती, आत्मविश्वास, धैर्य वाढवण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केला जात आहे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.