AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Amavashya: सर्व पितृ अमावस्येला करा हे सोपे उपाय, मिळेल पितृदोषापासून मुक्ती

सर्व पितृ अमावस्या म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा दिवस. या दिवशी कुटुंबियातील मृत व्यक्तींच्या नावे काही कर्म केल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते.

Pitru Amavashya: सर्व पितृ अमावस्येला करा हे सोपे उपाय, मिळेल पितृदोषापासून मुक्ती
सर्व पितृ अमावस्या Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Sep 23, 2022 | 9:49 AM
Share

मुंबई,  सध्या पितृ पक्ष (Pitru Paksha 2022) पंधरवाडा सुरु आहे. पितृपक्षात पितरांची पूजा आणि तर्पण केले जाते. पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख-समृद्धी प्राप्त होते, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षाच्या काळात सर्व पितर पृथ्वीवर राहतात. यावर्षी पितृ पक्ष 10 सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो 25 सप्टेंबरला संपणार आहे. पितृ पक्षाची समाप्ती आश्विन महिन्यातील अमावास्येला होते, याला सर्व पितृ अमावस्या (SarvaPitru Amavasya 2022) म्हणतात. 25 सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्या आहे. पितृ पक्षाच्या दिवशी लोकं अनेक विशेष उपाय करून आपल्या पितरांना प्रसन्न करतात, ज्यामुळे त्यांच्या घरात पितृदोष राहत नाही आणि सुख-समृद्धी टिकून राहते. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला या काळात तर्पण किंवा पितृशांतीचे उपाय करता आले नाहीत, तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. चला जाणून घेऊया सर्व पितृ अमावस्येशी संबंधित खास उपाय.

पिंपळाच्या झाडाची पूजा –

सर्व पितृ  अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठून पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. यामुळे पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात.

पिंडदान/तर्पण –

धार्मिक मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पितरांची पूजा करावी. पितृ पक्षात पिंडदान-तर्पणला खूप महत्त्व आहे. यामुळे पूर्वज प्रसन्न राहतात आणि आपल्याला सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात.

दान-धर्म-

ज्योतिषांच्या मते, सर्व पितृ अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते. सर्वपित्री अमावस्येला ब्राह्मणाला दान करावे. तसेच चांदीचे दान करणे श्रेष्ठ मानले जाते. यामुळे पूर्वज समाधानी राहतात, असे मानले जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू-बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून संजय शिरसाट संतापले; म्हणाले, आम्ही बदनाम...
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा बदामावर
शेतकऱ्यांची पिकं दुष्काळामुळे करपली अन् आढावा बैठकीत नेत्यांचा काजु-बदामावर ताव
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल