AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीच्या तीसऱ्या दिवशी वाचा देवी चंद्रघंटा हिची व्रत कथा, मिळेल इच्छित फळ

एके काळी महिषासुर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती. त्याच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ माजली होती. देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासुर खूप शक्तिशाली झाला होता. तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता.

Shardiya Navratri 2023 : नवरात्रीच्या तीसऱ्या दिवशी वाचा देवी चंद्रघंटा हिची व्रत कथा, मिळेल इच्छित फळ
देवी चंद्रघंटाImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 17, 2023 | 9:44 AM
Share

मुंबई : शारदीय नवरात्रीच्या (Shardiya Navratri 2023) तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास केला जातो. देवी चंद्रघंटा ही  प्रेमाचा सागर आहे असे सनातनच्या धर्मग्रंथात अंतर्भूत आहे. तिचा महिमा अनन्यसाधारण आहे. ती तिच्या भक्तांचे रक्षण करते आणि दुष्टांचा नाश करते. शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने साधकाच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच घरामध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्य नांदते. आज चंद्रघंटा मातेची आराधना करताना विधीनुसार मातेची पूजा करा. तसेच, पूजेच्या वेळी व्रतकथेचा पाठ अवश्य करा.

व्रत कथा

एके काळी महिषासुर नावाच्या राक्षसाची मोठी दहशत होती. त्याच्या दहशतीमुळे तिन्ही जगात खळबळ माजली होती. देवाने दिलेल्या अपार शक्तीमुळे महिषासुर खूप शक्तिशाली झाला होता. तो आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून स्वर्गावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू पाहत होता. या प्रयत्नात त्याला जवळपास यश आले. त्यावेळी स्वर्गातील देवता भयभीत झाले. खुद्द राजा इंद्रही काळजीत पडला. महिषासुराला स्वर्गाचे सिंहासन मिळवायचे होते.

त्यावेळी सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांची मदत मागितली. ब्रह्माजी म्हणाले- सध्या महिषासुराचा पराभव करणे सोपे नाही. त्यासाठी आपण सर्वांना महादेवाचा आश्रय घ्यावा लागेल. त्यावेळेस सर्व देव प्रथम सृष्टीचे निर्माते भगवान विष्णू यांच्याकडे गेले आणि त्यांची संमती घेऊन ते सर्व कैलास महादेवाकडे पोहोचले.  राजा इंद्राने महादेवाला आपली समस्या सांगितली.  इंद्राचे शब्द ऐकून महादेव संतापले आणि म्हणाले – महिषासुर आपल्या शक्तीचा चुकीच्या मार्गाने वापर करत आहे. याची शिक्षा त्याला नक्कीच भोगावी लागेल.

त्यावेळी भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधातून एक तेज प्रकट झाले. हे तेज म्हणजेच ऊर्जा त्याच्या मुखातून प्रकट झाली. या उर्जेतून एक देवी प्रकट झाली. त्या वेळी भगवान शिवाने आपले त्रिशूळ मातेला दिले. भगवान विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र दिले. इंद्राने घंटा दिली. अशा प्रकारे सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला दिली.

त्यानंतर माता चंद्रघंटा यांनी त्रिमूर्तीची परवानगी घेतली आणि महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले. पुढे माता चंद्रघंटा आणि महिषासुर यांच्यात भयंकर युद्ध झाले असे शास्त्रात नमूद केले आहे. या युद्धात महिषासुर देवीपुढे टिकू शकला नाही. त्यावेळी मातेने महिषासुराचा वध करून तिन्ही जगाचे रक्षण केले. तिन्ही लोकांमध्ये देवीची स्तुती सुरू झाली. प्राचीन काळापासून चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते. देवी आपल्या भक्तांचे सर्व दु:ख दूर करते. तसेच सुख, समृद्धी आणि शांती प्रदान करते. त्यामुळे शारदीय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्त चंद्रघंटा देवीची भक्तिभावाने पूजा करतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.