AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shravan 2022: महाभारत काळातील कौलेश्वरी शिव मंदिर, जिथे पांडवांनी केली होती महादेवाची पूजा

अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिरात महादेवाची पूजा केली होती. सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेल्या कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेकासाठी नैसर्गिक तलाव आहे. येथे भाविक स्नान करून महादेवाला अभिषेक करतात.

Shravan 2022: महाभारत काळातील कौलेश्वरी शिव मंदिर, जिथे पांडवांनी केली होती महादेवाची पूजा
कौलेश्वरी मंदिर जेथे पांडवांनी केली होती पूजा Image Credit source: Social Media
| Updated on: Jul 27, 2022 | 9:51 AM
Share

कौलेश्वरी पर्वत हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनासाठी ओळखले जाते. हे ठिकाण कौलेश्वरी देवीचे (Kauleshwari Devi) दिव्य दर्शन आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे. पर्वताच्या शिखरावर महाभारत (Mahabharat) काळातील भोलेनाथाचे मंदिर असल्याचे मानले जाते. अज्ञातवासात असताना पांडवांनी या मंदिरात महादेवाची पूजा केली होती. सुमारे 2 हजार फूट उंचीवर असलेल्या कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेकासाठी नैसर्गिक तलाव आहे. येथे भाविक स्नान करून महादेवाला अभिषेक करतात. शिवमंदिरात दर सोमवारी विशेष भजन-कीर्तन होते. सध्या उत्तर भारतीयांचा श्रावण महिना सुरु आहे. 29 जुलैपासून मराठी म्हणजेच महाराष्ट्रीयन लोकांचा श्रावण महिना सुरू होतोय. श्रावणात महादेवाच्या दर्शनाला जाण्याला आणि अभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळात अनेक जण प्राचीन शिवमंदिरात दर्शनासाठी जातात. या निमित्याने TV9 मराठी सातत्याने देशातील प्रसिद्ध मंदिराविषयी माहिती देत आहे.

माता कौलेश्वरी आहे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र

पौराणिक कथेनुसार, महाभारत काळात ही राजा विराटची राजधानी होती. राजा विराटने माता कौलेश्वरीची मूर्ती बसवली होती. तेव्हापासून देवी कौलेश्वरी हे श्रद्धेचे केंद्र राहिले आहे. बौद्ध धर्मासाठी हा पर्वत भगवान बुद्धांच्या तपोभूमीसह मोक्षप्राप्तीचे ठिकाण आहे. डोंगरात बौद्ध भिक्खूंच्या अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत.

येथे झाला होता अभिमन्यू-उत्तरा विवाह

कौलेश्वरी शिव मंदिराचा इतिहास महाभारत काळापासूनचा आहे. मंदिराशेजारी असलेल्या मांडवा मंडईत अर्जुनाचा मुलगा अभिमन्यूचा विवाह राजा विराटाची कन्या उत्तरा हिच्याशी झाला होता अशी आख्यायिका आहे.

रिकाम्या हाताने येतात भाविक

कौलेश्वरी पर्वताच्या शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी भाविकांना काहीही घेऊन जाण्याची गरज नाही. मंदिराभोवतीच पूजेचे साहित्य उपलब्ध आहे. स्थानिक नागरिक मंदिराच्या आवारातून फुले, बेलची पाने आणि पाणी विकत घेऊन महादेवाला अर्पण करतात.

मंदिराचे वैशिष्ट्य

पौराणिक मान्यतेनुसार, पांडवांनी अज्ञातवासात असताना या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली होती अशी आख्यायिका आहे. याशिवाय भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांनीसुद्धा वनवासाच्या काळात या मंदिरात वेळ घालविल्याचे सांगण्यात येते. भगवान शंकराच्या पूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंदिरात दर सोमवारी भाविक भजन-कीर्तन करतात.

चतरा येथील कौलेश्वरी पर्वतावर एक तलाव असून भोलेनाथाच्या अभिषेकासाठी भक्त येथून पाणी नेतात. कोलुआ पर्वतावर वसलेल्या या भोलेनाथाच्या मंदिरात भाविकांना बाहेरून काहीही आणण्यास मनाई आहे कारण मंदिराजवळच पूजेचे साहित्य उपलब्ध आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.