AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनवासाच्या काळात श्री रामाने या जंगलात घालवला होता सर्वाधीक काळ, काय आहे त्याचे नाव?

प्रभू राम वनवासात गेले तेव्हा त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केला आणि रामेश्वरम आणि नंतर श्रीलंका येथे समाप्त झाला.

वनवासाच्या काळात श्री रामाने या जंगलात घालवला होता सर्वाधीक काळ, काय आहे त्याचे नाव?
राम वनवास Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 18, 2023 | 10:30 AM
Share

मुंबई : श्रीरामांना 14 वर्षे वनवास भोगावा लागला आणि या वनवासाच्या (Ram Vanvas) काळात श्रीरामांनी अनेक ऋषीमुनींकडून शिक्षण आणि ज्ञान प्राप्त केले, तसेच तपश्चर्या करून आदिवासी, वनवासी आणि सर्व प्रकारच्या भारतीय समाजाला संघटित करून धर्माच्या मार्गावर नेले. त्यांनी संपूर्ण भारताला एका विचारसरणीच्या धाग्यात बांधले. वाल्मिकी रामायणात राम वनवासात गेल्यावर त्यांची कथा लिहिली आहे. प्रभू राम वनवासात गेले तेव्हा त्यांनी अयोध्येतून प्रवास सुरू केला आणि रामेश्वरम आणि नंतर श्रीलंका येथे समाप्त झाला. इतिहासकार डॉ. राम अवतार यांनी श्रीराम आणि सीता यांच्या जीवनातील घटनांशी संबंधित अशा 200 हून अधिक ठिकाणे शोधून काढली आहेत, जिथे आजही श्रीराम आणि सीता कुठे राहिले किंवा वास्तव्यास आहेत अशी स्मारके आहेत. जाणून घेऊया कोणती आहेत ती ठिकाणे.

या वनात राहत होते राम-सीता आणि लक्ष्मण

राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षे वनवासात गेले आणि राक्षसांचा राजा रावणाचा पराभव करून आपल्या राज्यात परतले ही रामायणातील कथा आपल्या सर्वांना माहीत आहे. आपल्यापैकी बहुतेकांना माहित आहे की राम, लक्ष्मण आणि सीता यांनी जंगलात अनेक वर्षे घालवली, परंतु फार कमी लोकांना त्या जंगलाचे नाव माहित असेल. त्या वनाचे नाव दंडकारण्य होते ज्यात राम, सीता आणि लक्ष्मण यांनी वनवास घालवला होता. हे जंगल सुमारे 35,600 चौरस मैलांमध्ये पसरले होते, ज्यामध्ये सध्याचे छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा काही भाग समाविष्ट होता. त्या काळी हे जंगल भयंकर राक्षसांचे निवासस्थान मानले जात होते, म्हणून याला दंडकारण्य असे नाव पडले होते जेथे “दंड” म्हणजे “शिक्षा देणे” आणि “अरण्य” म्हणजे “जंगल”.

घनदाट जंगल होते दंडकारण्य

राम, लक्ष्मण आणि सीता 10 वर्षे ऋषी-मुनींच्या आश्रमात राहिले, ते सर्व दंडकारण्यमध्ये होते. दंडकारण्य हे घनदाट जंगल होते, जिथे वन्य प्राण्यांची आणि राक्षसांची भीती नेहमीच असायची. चित्रकूटच्या पुढे जंगलात प्रवेश करण्यापूर्वी अत्री ऋषींच्या आश्रमात जमलेल्या ऋषींनी रामाला राक्षसांपासून मुक्ती मिळावी अशी विनंती केली होती. या 10 वर्षांत, रामाने संपूर्ण छत्तीसगडमधून राक्षसांचा नायनाट केला, त्यानंतर ते आंध्रमार्गे दक्षिणेकडे गेले.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....