AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surya Arghya: सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे आहेत अनेक फायदे, रविवारी केलेल्या या उपायाने मिळतो विशेष लाभ

हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते. पुजापाठ केल्यानंतर अनेक जण  सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान-सन्मान वाढतो अशी मान्यता आहे.

Surya Arghya: सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे आहेत अनेक फायदे, रविवारी केलेल्या या उपायाने मिळतो विशेष लाभ
सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 18, 2022 | 11:14 AM
Share

हिंदू धर्मात रविवार हा सूर्य देवाला (Surya Dev) समर्पित आहे. असे मानले जाते की, सूर्य हा एकमेव देव आहे जो नियमितपणे भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देतो. माणसाच्या आयुष्यात सूर्याचे मोठे योगदान असते. जोतिषशास्त्रानुसार (Astrology) कुंडलीत सूर्याचे स्थान बलवान असेल तर त्या व्यक्तीला जीवनात भरपूर यश आणि प्रसिद्धी मिळते. दुसरीकडे, कुंडलीत सूर्याची स्थिती योग्य नसल्यास जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा वेळी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी सूर्याला जल अर्पण (Surya Arghya) करावे. हिंदू धर्मात सूर्याची देवता म्हणून पूजा केली जाते. पुजापाठ केल्यानंतर अनेक जण  सकाळी सूर्याला अर्घ्य देतात. सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि मान-सन्मान वाढतो अशी मान्यता आहे. याशिवाय कोणत्याही कारणाने लग्नाला उशीर होत असेल तर नियमितपणे सूर्याला जल अर्पण केल्यास विवाह योग लवकर जुळून येतो, पण सूर्याला जल देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत

सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण करावे. सूर्याला फक्त सकाळी म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी जल अर्पण करावे. सकाळी अर्घ्य देणे  फायदेशीर मानले जाते. सूर्याला अर्घ्य देताना आपले तोंड पूर्वेकडे असावे. पाण्यात रोली किंवा लाल चंदन टाकावे. याशिवाय सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.

सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे लाभ

दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सूर्यदेवाचा प्रभाव शरीरावर वाढतो, अशी धार्मिक मान्यता आहे. यामुळे तुमच्यातील ऊर्जा वाढते. तसेच रोज सूर्याला जल अर्पण केल्याने आत्मशुद्धी आणि बल प्राप्त होते. समाजात मान-सन्मानही वाढतो.

रविवारी करावा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप

रविवारी जल अर्पण केल्यानंतर सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. सूर्याच्या या मंत्रांचा जप केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. मंत्राचा जप करताना उच्चर स्पष्ट असावे.

  • ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य:
  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
  • ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
  • ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ
  • ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः
  • ॐ सूर्याय नम:
  • ॐ घृणि सूर्याय नम:
  • ॐ भास्कराय नमः
  • ॐ अर्काय नमः
  • ॐ सवित्रे नमः

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.